विशेष प्रतिनिधी
नवी मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा २० हजार पेक्षा अधिक झाल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून चिंता करण्याचे गरज नसल्याचे म्हंटले आहे. There is no need to worry even though the number of corona patients is increasing: Health Minister Rajesh Tope’s reaction
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. मात्र रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढली असली तरी रुग्णालयात बेड्स शिल्लक आहेत. ऑक्सिजनची मागणी देखील वाढली नाही.त्यामुळे चिंता करण्याची गरज नसल्याचे राजेश टोपे यांनी म्हंटले आहे. यासोबतच राज्यात अधिक निर्बंध लागू करायचे नसतील तर जनतेने सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले. बीएसव्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरच्या उदघाटन प्रसंगी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे वक्तव्य केले आहे.