• Download App
    ....तर विद्यापीठांचा सत्यानाश होईल ; चित्रा वाघ यांचा घणाघात। .... then the universities will be ruined; Chitra Wagh's Ghanaghat

    ….तर विद्यापीठांचा सत्यानाश होईल ; चित्रा वाघ यांचा घणाघात

    राज्यपालांचे अधिकार कमी होणार आहेत.विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत. …. then the universities will be ruined; Chitra Wagh’s Ghanaghat


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : काल (२८ डिसेंबर) विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मात्र शेवटचा दिवस विरोधकांच्या गोंधळानेच सर्वाधिक गाजला. काल राज्यपालांचे अधिकार कमी करणारे विद्यापीठ सुधारणा विधेयक गोंधळात मंजूर करण्यात आले.मात्र या विधेयकाला भाजपने विरोध केला असून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही विधेयक चर्चेविना मंजूर करण्यात आल्याने टीका केली आहे.

    नेमक्या काय म्हणाल्या चित्रा वाघ

    विद्यापीठांना सरकारी महामंडळ करण्याचं काम सुरू आहे.विद्यापीठांवर सरकारचा ताबा आणला जात असून सगळे अधिकार थेट मंत्री घेत आहेत. यामुळे विद्यापीठाचा सत्यानाश होईल. तुमच्या PA कडे रांगा लागतील. मर्जीनुसार कोर्सेस तयार केले जातील. असा घणाघात चित्रा वाघ यांनी ट्वीट करत केला आहे.

    दरम्यान राज्य सरकारच्या या विधेयकामुळे आता राज्यपालांचे अधिकार कमी होणार आहेत.विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती आता थेट राज्यपाल करू शकणार नाहीत.तसेच राज्यातील विद्यापीठांवर अंकुश ठेवण्यासाठी प्र-कुलपतीपद निर्माण करण्यात येणार आहे. या प्र-कुलपतीपदी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री असणार आहेत.

    …. then the universities will be ruined; Chitra Wagh’s Ghanaghat

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : एकनाथ शिंदे म्हणाले- मोदी हात लावतात तिथे सोने होते; जिथं मोदी जातात, तिथं विकासाची सुवर्णरेषा उमटते

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!