• Download App
    केंद्रीय रेल्वे मंत्री मागील पाच दिवसापासून मुंबईत पोटनिवडणुकीच्या प्रचार कामासाठी आले आहेत, जशी एअर इंडिया विकली तशी रेल्वेदेखील विकली का? : संजय राऊतThe Union Railway Minister has been in Mumbai for the last five days for the by-election campaign. Did he sell the railways just like Air India did? : Sanjay Raut

    केंद्रीय रेल्वे मंत्री मागील पाच दिवसापासून मुंबईत पोटनिवडणुकीच्या प्रचार कामासाठी आले आहेत, जशी एअर इंडिया विकली तशी रेल्वेदेखील विकली का?- संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : दादर नगर हवेली मध्ये लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यूनंतर ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या जागेवर निवडणूक लढवत आहेत. मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत प्रचारासाठी दादर नगर हवेलीचा दौऱ्यावर आहेत.The Union Railway Minister has been in Mumbai for the last five days for the by-election campaign. Did he sell the railways just like Air India did? : Sanjay Raut

    या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री मागील पाच दिवसापासून मुंबईमध्ये आहेत. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, जशी एअर इंडिया विकली तशी रेल्वेदेखील विकली का? रेल्वे मंत्रालयाला काही काम नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला.



    त्याचसोबत ते म्हणाले, ‘पश्चिम बंगालमध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ प्रचारासाठी गेले होते. पण तेथे ममता बॅनर्जी यांचाच विजय झाला. यावरून असे सिद्ध होते की, सत्याचाच नेहमी विजय होतो. आणखी कोणालाही प्रचारासाठी यायचे त्यांना येऊ दे. तुम्हाला जो बायडेन यांना घेऊन यायचं असेल….तर तसेही करा’ असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.

    प्रशासनाने हुकूमशाही पध्दतीने आपली ताकद वापरली तर निवडणुकींना काय अर्थ राहतो? असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी विचारला. लोकप्रतिनिधींचा आवाजात तुम्ही दाबत असाल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या जो काही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत, त्याचा काय उपयोग? सिल्वासा, दादर नगर हवेलीला आजही स्वातंत्र्य मिळालेले नाही. इथे प्रशासन लोकांना गुलाम असल्याचे मानते. हे तुमचे स्वातंत्र का? असा प्रश्नही यावेळी संजय राऊत यांनी मांडला आहे.

    The Union Railway Minister has been in Mumbai for the last five days for the by-election campaign. Did he sell the railways just like Air India did? : Sanjay Raut

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!