वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंधामुळे १५ जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत घट होत आहे. परंतु ग्रामीण भागातील २१ जिल्ह्य़ांत बाधितांची संख्या वाढतच आहे. ग्रामीण भागात लसीकरणाला प्राधान्य देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असून १८ लाख लसींची मागणी नोंदविल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली. The threat of corona persists in rural areas; Increase in the number of patients in 21 districts
रुग्णसंख्या घटलेले १५ जिल्हे कोणते ?
मुंबई, मुंबई उपनगरसह, ठाणे, रायगड, नाशिक, नांदेड, धुळे, भंडारा, लातूर, नंदुरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदिया.
रुग्ण वाढलेले जिल्हे
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरसह उर्वरित २० जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढत असून ही चिंतेची बाब आहे. त्यामध्ये रुग्णसंख्या कमी झालेल्या वरील 15 जिल्ह्यांचा समावेश नाही.
The threat of corona persists in rural areas; Increase in the number of patients in 21 districts
महत्त्वाच्या बातम्या