प्रतिनिधी
मुंबई – ठाकरे – पवार सरकारने महाराष्ट्रातल्या शाळा सुरू करायचा निर्णय घेतला हे बरोबर आहे. पण त्यामध्ये काही अटी – शर्तीही आहेत. शाळेत हजेरी लावण्याची पालकांची संमती हवी. विद्यार्थ्यांवर हजेरी बंधनकारक नाही. त्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद होणार नाही. या त्या अटी – शर्ती आहेत. हा खुलासा काँग्रेसच्या नेत्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केला आहे.The school bell will ring, however, students are not required to attend, online education will continue; Revealed by Varsha Gaikwad
कोविड नियमांचे पालन करतच 4 ऑक्टोबर २०२१ पासून राज्यात शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. याआधीही ऑगस्टमध्ये शाळा सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यावेळी त्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.
पण आता कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे आणि बहुतांशी भागांतील शिक्षक – शालेय कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण झा आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शाळांमधील घंटानाद ऐकायला मिळणार आहे.
- शाळेत येण्याची कुठल्याही विद्यार्थ्यावर सक्ती नसून, पालकांची संमती आवश्यक असणार आहे.
- कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व शाळांवर बंधनकारक असणार आहे.
- जे विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नाही त्यांचे शिक्षण बंद न राहता ऑनलाईन शाळा सुरू राहतील.
The school bell will ring, however, students are not required to attend, online education will continue; Revealed by Varsha Gaikwad
महत्त्वाच्या बातम्या
- यूपी एटीएस खुलासा: धर्मांतराची देशव्यापी सिंडिकेट चालवल्याबद्दल मौलानाला अटक, बहरीनकडून ट्रस्टला मिळाले 1.5 कोटी रुपये
- राज्यात अत्याचार थांबेनात : पुण्यात विवाहितेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, एका आरोपीला अटक, इतरांचा शोध सुरू
- कॅलिकत युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना द्यावा लागणारा ‘हुंडा घेणार नसल्याचा’ बॉंड
- तालिबानला आता संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्याची इच्छा, सोहेल शाहीन यांची संयुक्त राष्ट्र दूत म्हणून नियुक्ती