विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकारांसमोर आता महापुराचे संकट निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन परिस्थितीची माहिती दिली.The fierce form taken by the Panchganga; Kolhapur cityTowards flood
पंचगंगा नदीची पाणी पातळी ४९ फुटांवर पोचली असून ती पातळी ५० फुटांवर पोचण्याचा धोका निर्माण झाला आहे.
- धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे
- राधानगरी धरणाचे दरवाजे संध्याकाळी उघडतील
- अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारशी चर्चा
- मुंबई, पुण्यातून कर्नाटककडे वाहतूक रोखणार
- कोल्हापूरला नागरिक येऊ शकतात
- नागरिकांची व्यवस्था केली पाहिजे
- पाणथळ रुग्णालयातील रुग्ण इतर रुग्णालयात
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून चौकशी
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे लक्ष आहे
- धोकादायक ठिकाणी खासगी बस; चालकावर गुन्हा
- जिल्ह्यातील १० ठिकाणी हेलिपॅड तयार केले आहेत
- अत्यावश्यक वेळी वापर केला जाणार आहे
- पंचगंगा नदीची पाणी पातळी ४९ फुटांवर
- पाणी पातळी ५० फुटांवर पोचणार
- कोल्हापूरसाठी एनडीआरएफची आणखी एक टीम