• Download App
    देश खासगीकरणाच्या वाटेवर जात आहे. त्यामुळे आपापसातले मतभेद विसरून देशातील सर्व चळवळीं एकत्र करून जनतेची शक्ती वाढवु : राजू शेट्टी | The country is on the path to privatization. Therefore, let's forget our differences and increase the power of the people by uniting all the movements in the country: Raju Shetty

    देश खासगीकरणाच्या वाटेवर जात आहे. त्यामुळे आपापसातले मतभेद विसरून देशातील सर्व चळवळीं एकत्र करून जनतेची शक्ती वाढवु ;राजू शेट्टी

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : शेतकऱ्यांचे प्रश्न हाताळण्यात राज्य आणि केंद्र सरकार विषयी आपली नाराजी काही दिवसांपूर्वीच राजू शेट्टी यांनी बोलून दाखवली होती. राज्यातील 30 ते 35 साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी द्यायला जमतं तर सहकार मंत्र्यांना नेमकी काय अडचण आहे? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी विचारला होता.

    The country is on the path to privatization. Therefore, let’s forget our differences and increase the power of the people by uniting all the movements in the country: Raju Shetty

    पुढे ते म्हणतात, कायद्याने एकरकमी एफआरपीचा हक्क असतानाही, जर तो डावलला जात असेल तर तसे करणारे साखर का सुरू होऊ द्यावेत? ऊस उत्पादकांवर अन्याय झाल्यास ऊस गळती हंगाम जोमात असतानाही तो बंद पाडू. असा इशाराही राजू शेट्टी यांनी यावेळी दिला आहे.

    यशवंतराव चव्हाण, पी डी पाटील यांचा वारसा सांगताना ते म्हणाले, बाळासाहेब पाटील सहकारमंत्री झाले. पण शेतकर्यांना कायद्याने त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळवून देण्याऐवजी शेतकर्यांचे रक्षण न करता भक्षकांसारखे का वागत आहेत? असे बोलून त्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका करताना पुढे राजू शेट्टी म्हणाले, ते सहकारमंत्री आहेत की सह्याद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत? हे समजून येत नसल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला.


    राजू शेट्टींचा किरीट सोमय्या आणि अजित पवार यांच्यावर निशाणा


    देशात आता जवळपास सर्व चळवळी संपल्यामध्ये जमा आहेत. केवळ कामगार आणि शेतकरी चळवळ तग धरून उभी आहे. पण ही देखील चळवळ संपविण्याचा घाट घातला जात आहे. देश खासगीकरणाच्या वाटेवर जात आहे. एअर इंडिया विकली गेली. बीएसएनएलचा आता नंबर लागू शकतो. ही खुली व्यवस्था मक्तेदारीला चालना देणारी आहे. ही मोडून काढण्याची ताकद फक्त चळवळीमध्ये असते. त्यामुळे आपापसातले मतभेद विसरून देशातील सर्व चळवळीं एकत्र करून जनतेची शक्ती वाढवु. असेदेखील ते यावेळी म्हणाले आहेत.

    The country is on the path to privatization. Therefore, let’s forget our differences and increase the power of the people by uniting all the movements in the country: Raju Shetty

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!