प्रतिनिधी
कोल्हापूर : राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवाराची करू इच्छिणाऱ्या छत्रपती संभाजीराजे यांचा फोन न घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पिताश्री कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्याशी फोनवरून चर्चा केली. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी स्वतः ही माहिती दिली. The Chief Minister who did not take Sambhaji Raje’s phone, however, had a phone conversation with Shahu Maharaj
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार शाहू महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी ते न्यू पॅलेस येथे आले होते. शाहू महाराज यांच्याशी सदिच्छा भेट घेऊन त्यांनी शिवसेनेच्या राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी आशीर्वाद घेतले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्यानंतर मी शाहू महाराजांना येऊन भेटलो. शाहू महाराजांचे आणि ठाकरे कुटुंबियांचे जुने संबंध आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे येथे येऊन गेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांशी फोनवरून राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली, अशी माहिती संजय राऊत यांनी शाहू महाराजांच्या भेटीनंतर पत्रकारांना दिली.
– मुख्यमंत्र्यांनी फोन घेतला नाही : संभाजीराजे
मुख्यमंत्र्यांनी माझ्या अपक्ष उमेदवारीसाठी आधी शब्द दिला होता. पण नंतर तो शब्द फिरवला, असा आरोप संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. संजय पवार यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली. त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना स्वतःहून फोन केला होता. परंतु त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी माझा फोन घेतला नाही, असा आरोप संभाजीराजे यांनी केला होता.
मुख्यमंत्र्यांच्या फोन न घेणे या मुद्द्यावरून देखील महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून बराच राजकीय गदारोळ झाला आहे. मात्र आता संभाजीराजे यांचा फोन न घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आज शाहू महाराजांशी फोनवरून चर्चा केली. ही माहिती खुद्द संजय राऊत यांनी दिली. या फोन पे चर्चा राजकीय नाट्याला महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्व आहे.
The Chief Minister who did not take Sambhaji Raje’s phone, however, had a phone conversation with Shahu Maharaj
महत्वाच्या बातम्या
- जमियतचे दिसले असली रंग; देवबंद मधील बैठकीत समान नागरी कायद्याविरुद्ध ठराव मंजूर!!
- संभाजीराजेंच्या नेतृत्व उदयामुळे पश्चिम महाराष्ट्रात कोणाचे नुकसान??; देवेंद्र फडणवीसांचे राष्ट्रवादीकडे बोट!!
- महाराष्ट्रात परिचारिकांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद; पण प्रशिक्षणार्थींवर कामाचा भार
- पीएम-किसान योजनेंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ
- रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; ३६१२ रिक्त पदांची भरती!!