• Download App
    स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 'आक्रोश पदयात्रा' आजपासून पुन्हा झाली सुरू The Akrosh Padayatra of Swabhimani Farmers Association has started again from today

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ‘आक्रोश पदयात्रा’ आजपासून पुन्हा झाली सुरू

    मराठा आरक्षणास पाठींबा देत आक्रोश पदयात्रा  स्थगित केली होती. 

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : मराठा आरक्षणास पाठींबा देत स्थगित करण्यात आलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आक्रेश पदयात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. साखराळे येथील राजारामबापू सहकारी साखर कारखान्यापासून  ही यात्रा आज सकाळी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. The Akrosh Padayatra of Swabhimani Shetkari Sanghatana has started again from today

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील हंगामातील ४०० रुपये मिळावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कर्नाटकातील सदलगा येथे उसाच्या फडात जाऊन ऊसतोड बंद पाडत, रोष व्यक्त केला आहे.

    ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ४०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार व शेतकरी संघटना प्रतिनिधींची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.मात्र यामध्येही मार्ग निघाला नसल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदाराविरुद्ध आक्रमक धोरण स्वीकारले आहे.

    या अगोदर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू  केलेल्या उपोषणास पाठींबा म्हणून राजू शेट्टी यांनी  २२ दिवसाची ५२२ किलोमीटरची आक्रोश यात्रा १३ व्या दिवशी स्थगित केली होती.

    The Akrosh Padayatra of Swabhimani Shetkari Sanghatana has started again from today

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Lohagad Murder Case : सियाने केतनचा खून करण्यासाठी केली राजा रघुवंशी प्रकरणाची स्टडी; सर्च हिस्ट्रीतून रहस्य उघड; हेही विचारले- पोलिस कोठडीत महिलेला मारहाण होते का?

    Ashadhi Wari 2026 : वारीत अत्यावश्यक रुग्णांकरिता प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची माहिती

    Raigad Waterfall Rescue : रायगडमध्ये धबधब्यावर अडकलेल्या 100 पर्यटकांची सुटका:वसईत 20 गाड्या बुडाल्या; मानखुर्दमध्ये चाळ कोसळून 6 जणांचा मृत्यू