विशेष प्रतिनिधी
अकोला : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विषय संपला आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वतःमध्ये बदल केले नाहीत, तर त्यांच्या पक्षांची ही इतरांसारखीच वाताहत होईल, असे राजकीय भाकित प्रकाश आंबेडकर यांनी वर्तविले आहे. Thackeray + Pawar’s parties will suffer like others
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण नेहमीच स्वार्थ केंद्रित राहिले, पण आताचा जमाना तशा राजकारणाचा नाही. त्यामुळे ठाकरे आणि पवारांनी आपल्या स्वतःमध्ये काळानुरूप बदल केले नाहीत, तर त्यांच्या पक्षाची ही इतरांसारखीच वातहत होईल, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
लोकशाही आणि उमेदवारांचे सामाजिकीकरण करण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीने विविध समाज घटकांमधल्या कार्यकर्त्यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. त्यामुळे प्रस्थापितांच्या जातीवादाला चाप बसू शकेल. समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा विषय संपुष्टात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणामध्ये आमुलाग्र बदल होतील. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपले स्वार्थ केंद्रित राजकारण बदलून स्वतःमध्ये बदल घडवून आणला नाही, तर त्या दोघांच्याही पक्षांचे इतर राजकीय पक्षांसारखीच वाताहात होईल, असे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवले.
Thackeray + Pawar’s parties will suffer like others
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस नेत्यांशी संबंधित संघटना RSSच्या नावाचा करत आहे गैरवापर – भाजपचा आरोप!
- छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई; इनाम असलेल्या तिघांसह १२ नक्षलवाद्यांना अटक!
- भाजपने केली मोठी मागणी! बंगालमध्ये निवडणुकीनंतरही केंद्रीय सुरक्षा दल तैनात ठेवावे
- उत्तर पश्चिम मुंबईत गजानन कीर्तिकर “सेफ गेम”साठी मैदानात; पण ईडीच्या नोटीशी पुढे मुलगा टिकेल का निवडणुकीत??