• Download App
    ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस, ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून आंदोलनाचा विनायक मेटे यांचा इशारा|Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government

    ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस, ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी २ सप्टेंबरपासून आंदोलनाचा विनायक मेटे यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : फडणवीस सरकारच्या काळात मराठा आरक्षणाच्या संघषार्ला यश आले होते. पण ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यात अपयशी ठरले.Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government

    सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या ढिम्म सरकारला जागे करण्यासाठी 2 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवसंग्राम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिला आहे.



    पत्रकारांशी बोलताना मेटे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठलाही निर्णय न घेणारे हे ठाकरे सरकार म्हणजे पाण्यात बसलेली म्हैस आहे. या म्हशीला आता टोचण्यासाठी शिवसंग्राम संघटनेसह मराठा समाजाला आक्रमक भूमिका घ्यावी लागणार आहे. ठाकरे सरकारला आम्ही 2 सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नाही तर, 2 सप्टेंबरला राज्यभर धरणे आंदोलनं, त्यानंतर मेळावे व मोर्चे काढण्यात येतील.

    छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन शिवसेना सरकारमध्ये आली. मात्र, छत्रपतींच्या स्मारकाबाबत गेल्या 2 वर्षात मुख्यमंत्री ठाकरे यांनी 2 मिनिटंही वेळ दिला नसल्याचा आरोप मेटे यांनी केला. शिवस्मारकाचा विषयही निष्क्रिय मंत्री अशोक चव्हाण यांच्या खात्याकडे असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे मराठा समाजाबद्दल असलेले प्रेम हे बेगडी व पुतणा मावशीचे असल्याचा आरोप मेटे यांनी केला.

    Thackeray government is a buffalo sitting in water, Vinayak Mete warns of agitation from September 2 to wake up Dhimma government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mohan Bhagwat : दबावाने धर्मांतर म्हणजे हिंसा, स्वेच्छेने केल्यास हरकत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत

    Satish Shukla : पुरोहित संघाचा वाद न्यायालयापर्यंत खेचण्याची खुमखुमी; अविश्वास ठराव मंजूर होऊनही सोडवेना खुर्ची!!

    अजूनही “टाळी”, “पावले”, “फोन कॉल” पर्यंतच युतीची भाषा; पण ठाकरे बंधू अजूनही एकमेकांशी बोलेनात!!