• Download App
    Taslima Nasreen ‘’बांगलादेश भारतविरोधी आहे, इतिहास नष्ट करत आहे’’

    Taslima Nasreen : ‘’बांगलादेश भारतविरोधी आहे, इतिहास नष्ट करत आहे’’

    Taslima Nasreen

    तस्लिमा नसरीन यांचा जमात-ए-इस्लामीवर हल्लाबोल


    विशेष प्रतिनिधी

    ढाका : Taslima Nasreen बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी रविवारी बांगलादेशातील परिस्थितीवर मोठे विधान केले. त्यांनी बांगलादेशातील राजकीय पक्ष जमात-ए-इस्लामीवर हल्ला केला. त्या म्हणाल्या की, जमात-ए-इस्लामीने बांगलादेशवर कब्जा केला आहे आणि बांगलादेशचा इतिहास नष्ट करत आहे. एवढेच नाही तर तस्लिमा  ( Taslima Nasreen ) पुढे म्हणाल्या की, जमात-ए-इस्लामीचे लोक पाकिस्तानचे समर्थक आणि भारताचे विरोधक आहेत. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना सरकार उलथवून टाकण्यात आले.Taslima Nasreen

    बांगलादेशी लेखिका नसरीन यांनी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे हे विधान केले. माध्यमांशी बोलताना तस्लिमा नसरीन म्हणाल्या, ‘मला वाटते की देश आता जमात-ए-इस्लामी, जिहादी आणि अतिरेकी गटांनी व्यापला आहे आणि ते बांगलादेशचा इतिहास नष्ट करत आहेत. त्यांनी सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे पुतळे नष्ट केले.



    त्या पुढे म्हणाल्या की, ‘१९७१ मध्ये जमात-ए-इस्लामीच्या लोकांनी मुक्ती युद्धातील संग्रहालये नष्ट केली. त्यांनी राष्ट्रपिता शेख मुजीबुर रहमान यांचे घर उद्ध्वस्त केले. तसेच, अवामी लीग पक्षात सहभागी असलेल्यांना एकतर मारण्यात आले किंवा तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे ही चांगली परिस्थिती नाही.

    तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेशात निष्पक्ष निवडणुका घेण्याची मागणी मांडली. त्या म्हणाल्या की आता बांगलादेशात निष्पक्ष निवडणुका झाल्या पाहिजेत. त्यांनी जमात-ए-इस्लामीचे राजकारण समाजासाठी हानिकारक असल्याचे वर्णन केले आणि म्हणूनच त्यावर बंदी घातली पाहिजे. युनुस सरकारवर हल्लाबोल करताना तस्लिमा नसरी म्हणाल्या की, जिहादी गट, दहशतवादी गट आणि इस्लामिक दहशतवादी गट आता बांगलादेशात सत्तेत आहेत.

    Taslima Nasreen said Bangladesh is anti-India destroying history

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शेती भूषण दादा लाड, भारतभूषणदासजी महाराज यांना जनकल्याण समितीचा श्रीगुरुजी पुरस्कार जाहीर

    देवेंद्र फडणवीसांचा “अधिकार” नाकारून शरद पवार आपल्याला हवे तसे विलीनीकरण पुढे रेटू शकतील??

    पुण्याच्या भविष्यासाठी निर्णायक पाऊल, पुरंदर विमानतळाला गती; 1216 आर हेक्टर जमिनीची संयुक्त मोजणी करून शासनाला अहवाल देण्याचे निर्देश