• Download App
    Suresh Dhas सुरेश धस यांचा आरोप, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना

    Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप, धनंजय मुंडे कृषिमंत्री असताना 300 कोटींचा ‎घोटाळा, वाल्मीकनेच ठरवल्या निविदा!

    Suresh Dhas

    प्रतिनिधी

    बीड : Suresh Dhas राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या‎‎कार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटी‎‎रुपयांचा घोटाळा झाला आहे.‎‎वाल्मीक कराडने निविदा ठरवल्या,‎‎महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोप‎‎भाजप आमदार सुरेश धस यांनी‎‎केला. गुरुवारी आष्टीत त्यांनी‎पत्रपरिषद घेतली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचा‎अधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.‎सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनी‎स्वतः राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे का देत‎नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.‎Suresh Dhas

    आमदार धस म्हणाले, शेतकरी किंवा क्षेत्रीय‎अधिकाऱ्यांची मागणी नसताना धनंजय मुंडे यांनी‎खरेदीचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवला‎आणि त्याच दिवशी शासन निर्णय (जीआर) निघाला.‎कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे निविष्ठा खरेदीत बदल‎केला. नॅनो युरिया खरेदीत २१ कोटी २६ लाखांचा घोटाळा‎करण्यात आलेला आहे, असे धस यांनी सांगितले.‎



    भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री‎देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या‎घोटाळ्याची चौकशी करण्याची‎मागणी केली होती. मात्र, वाल्मीक‎कराड यांनी हे पत्र फाडून टाकल्याचा‎आरोप आमदार धस यांनी केला.‎कृषी विभागाला आव्हान देतो, हे पत्र‎तुमच्याकडे आहे का, असा सवाल‎धस यांनी केला. मुख्यमंत्री‎फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे,‎अशी मागणी केली. धनंजय मुंडे‎यांनी केलेल्या बदल्यांमध्ये १००‎कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर‎आरोप त्यांनी केला. बदल्यांसाठीचे‎रेट कार्ड त्यांच्या सहकाऱ्यांकडे‎सापडले. या बदल्यांमधून मिळणारा‎पैसा थेट धनंजय मुंडे यांच्याकडे‎जात होता, असा दावा त्यांनी केला.‎

    खटला दाखल करा, धस यांचे मुंडे यांना आव्हान‎

    राज्यात ठराविक एजंटांची नेमणूक‎करण्यात आली होती. या सर्वांचे‎कॉल डिटेल्स तपासा. १०० कोटींपेक्षा‎अधिकचा भ्रष्टाचार यात आहे.‎वाल्मीक कराड याने निविदा‎ठरवल्या. गैरव्यवहार केवळ‎बीडपुरता नव्हता, तर संपूर्ण‎महाराष्ट्रभर पसरलेला होता. आता‎कागदाचा लढा सुरू झाला आहे,‎खटला दाखल झाला तरी मी माघार‎घेणार नाही, असे धस म्हणाले.‎धनंजय मुंडे यांनी अंजली‎दमानियांऐवजी माझ्यावर खटला‎दाखल करावा, असे आव्हान दिले.‎

    मंत्री मुंडे राजीनामा का देत नाहीत, आ. धसांचा सवाल ‎

    धनंजय मुंडे यांनी आता अर्ज आणि‎लगेच कर्ज या पद्धतीने सर्व प्रक्रिया‎केली. टेंडर अतिशय नियोजनबद्ध‎पद्धतीने काढले. कुणालाही संशय‎येऊ नये याची काळजी घेतली. नॅनो‎युरियामध्ये २१ कोटी २६ लाख,‎डीएपीमध्ये ५६ कोटी ७६ लाख,‎बॅटरी खरेदीत ४५ कोटी ५३ लाख‎आणि कापूस साठवणुकीची ५७७‎रुपयांची बॅग १,२५० रुपयांना खरेदी‎करण्यात आली. एकूण १८० कोटी ८३‎लाख रुपये धनंजय मुंडे आणि‎त्यांच्या टीमने बाहेर काढल्याचा‎आरोप आमदार धस यांनी केला.‎रफिक नाईकवाडे हे या‎घोटाळ्यातील सूत्रधार असून, भामरे‎हे आजही त्यांच्यासोबत आहेत,‎असा दावा धस यांनी केला.‎

    Suresh Dhas alleges that there was a scam of Rs 300 crore when Dhananjay Munde was the Agriculture Minister, Valmik himself decided the tenders!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा