• Download App
    अकेला देवेंद्र क्या करेगा??, विचारणाऱ्या सुप्रिया सुळेंना आता भाजपने फडणवीसांवर "अन्याया" केल्याचे "दुःख"!! Supriya Sule comes to BJP Fadnavis

    अकेला देवेंद्र क्या करेगा??, विचारणाऱ्या सुप्रिया सुळेंना आता भाजपने फडणवीसांवर “अन्याया” केल्याचे “दुःख”!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिवसेनेला भाजपपासून तोडून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार बनविणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी अकेला देवेंद्र क्या करेगा??, असा खोचक सवाल केला होता. पण आता त्याच सुप्रिया सुळे यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपने केलेल्या कथित अन्यायाचे “दुःख” झाले आहे!! Supriya Sule comes to BJP Fadnavis

    देवेंद्र फडणवीस यांनी 105 आमदार निवडून आणले, पण भाजपने त्यांच्यावर अन्याय केला. त्यांना मुख्यमंत्री करण्याऐवजी उपमुख्यमंत्री केले. ते उपमुख्यमंत्री पद सुद्धा वाटून दिले आणि पालकमंत्री नेमण्याचे अधिकारही फडणवीस यांना ठेवले नाहीत, याचे मला दुःख होते. हे सगळे वेदनादायी आहेत, असे खोचक उदगार सुप्रिया सुळे यांनी काढले.


    सुप्रिया सुळे यांच्या भाषणात मोदींची स्तुती; सुषमा स्वराज, अरुण जेटलींचाही गौरव!!; त्यामुळे “इंडिया” आघाडीत संशयाचे मळभ!!


    याच सुप्रिया सुळे यांनी अकेला देवेंद्र क्या करेगा असे विचारून त्यांना हिणवले होते. पण अडीच वर्षांनंतर शरद पवारांच्या नियंत्रणाखालचे ठाकरे – पवार सरकार गेले. अजित पवार तिसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात आले. पुण्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच्या नेतृत्वाने त्यांना तीन महिने तंगविले. स्वतःच्या अटी शर्तींवर अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले.

    या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस गमावली आणि सुप्रिया सुळे यांना मात्र भाजपने देवेंद्र फडणवीसांवर केलेला “अन्याय” आठवला आणि त्यांनी फडणवीसांविषयी आता सहानुभूती व्यक्त केली. ती सहानुभूती व्यक्त करताना देखील मूळचा खोचक स्वभाव त्या विसरल्या नाहीत.

    Supriya Sule comes to BJP Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ