काही मागण्यांसाठी राज्यातील काही आगारांत संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.राज्यातील २५० पैकी ३९ आगारांमध्ये संप सुरूच आहे.ST employees will be fired if they do not return to work today; Anil Parab’s warning
विशेष प्रतिनिधी
मुंबई : 28 टक्के महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामुळे सणा-सुदीला घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.जवळपास १७ कामगार संघटनाच्या कृती समितीने २८ ऑक्टोबरला आंदोलन मागे घेतले होते. त्यानंतरही काही मागण्यांसाठी राज्यातील काही आगारांत संप सुरू असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
राज्यातील २५० पैकी ३९ आगारांमध्ये संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून, सोमवारपासून (१ नोव्हेंबर ) कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी रविवारी जाहीर केले.
काही राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कामगारांना संपास भाग पाडणे, आगारांना टाळे लावणे आदी प्रकार घडल्याचे एसटी महामंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याविरोधात महामंडळाने ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रोरीही नोंदविल्या आहेत.
दरम्यान संप मिटत नसल्याने ऐन दिवाळीत महामंडळालाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कर्मचाऱ्यांची समजूत काढून आगार सुरू करण्याचा प्रयत्न के ला जात होता. रात्री आठपर्यंत ३९ पैकी आठ आगारे सुरू झाली. उर्वरित मात्र बंदच होते. औद्योगिक न्यायालयानेही संपाला स्थगिती आदेश दिला असताना त्याचाही अवमान केला जात आहे.
ST employees will be fired if they do not return to work today; Anil Parab’s warning
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानात संगीत ऐकल्याने 13 जणांची गोळ्या झाडून हत्या, तालिबानने दोन आरोपींना केली अटक, एक फरार
- चीनच्या उलट्या बोंबा : म्हणे – कोरोनासाठी वुहान मार्केट नाही, तर सौदीचे झिंगे अन् ब्राझीलचं बीफ जबाबदार
- आंबा घाट जड वाहनांसाठी पुन्हा होणार खुला
- विखे-पाटलांचा महसूल मंत्री थोरातांवर हल्लाबोल, कोणत्या दूध संघाने किती पैसे लाटले याचा भांडाफोड हिवाळी अधिवेशनात करणार