• Download App
    Somnath Suryavanshi सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण, परभणीपा

    Somnath Suryavanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरण, परभणीपासून मंत्रालयापर्यंत लाँगमार्च; 16 फेब्रुवारीला मुंबईत धडकणार‎

    Somnath Suryavanshi

    विशेष प्रतिनिधी

    परभणी : Somnath Suryavanshi  सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू होऊन एक‎ महिना झाला, तरी दोषी पोलिसांवर कारवाई‎ झालेली नाही. या घटनेतील सर्व दोषींवर‎ कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी‎ आंबेडकरवादी नेते आणि संघटनांनी लाँगमार्च‎ काढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी‎ परभणीतील धरणे आंदोलन स्थळावरून हा‎ लाँगमार्च दुपारी ३ वाजता मुंबईतील‎ मंत्रालयाकडे रवाना झाला. त्यात हजारो‎ अनुयायी सहभागी झाले आहेत. लाँगमार्च‎ रवाना होण्यापूर्वी पोलिस आणि‎ आंदोलकांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली.Somnath Suryavanshi

    परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या‎ मृत्यूप्रकरणी अद्यापही चौकशी अत्यंत‎ संथगतीने चालू आहे. चौकशी कुठपर्यंत‎आली याबद्दल माहिती प्रशासनाने दिलेली‎ नाही. सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांना एक‎ कोटीची नुकसान भरपाई द्यावी, दंगलीत‎ विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे‎ घ्यावे, दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, या‎ प्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरी अनुयायांनी‎ लॉँगमार्च काढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी‎ 17 जानेवारीला परभणीतील डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाल्यानंतर‎ हा लॉँगमार्च मंत्रालयापर्यंत जाणार आहे.‎ लॉँगमार्च जसा पुढे जाईल, तशी सहभागी‎ आंदोलकांची संख्या वाढेल, असे संयोजन‎ समितीने सांगितले आहे. सुधीर साळवे,‎ आकाश लहाने, राहुलकुमार साळवे, गौतम‎ मुंढे, सुधीर कांबळे यांच्यासह हजारो अनुयायी‎ सहभागी झाले आहेत.‎



    परभणीतून सुरू झालेल्या‎ लाँगमार्चचा पहिला मुक्काम १०‎ किमीवरील टाकळी (कु.) येथे‎ झाला. १८ रोजी दुसरा मुक्काम‎ बोरी, ५० किमीवरील रांजेगाव येथे‎ तिसरा, २० रोजी देवगाव फाटा येथे‎ ७० किमीवर चौथा मुक्काम आहे.‎ आशिष वाकोडे हे लॉँगमार्चचे‎ नेतृत्त्व करत आहेत.‎

    मुंबईत न्याय न मिळाल्यास‎ दिल्लीत संसदेवर धडक‎

    मुंबईत मागण्या मान्य न झाल्यास‎ लॉँगमार्चसाठी दिल्लीकडे रवाना‎ होईल. त्यावेळी काँग्रेस नेते‎ खासदार राहुल गांधी, नाना पटोले,‎ बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर‎नेते सहभागी होतील. न्याय‎ मिळवण्यासाठी संसदेवर धडक‎ दिली जाणार आहे.‎

    परभणीतून सुरुवात झाल्यानंतर लाँगमार्च ‎जिंतूर-जालना -छत्रपती‎ संभाजीनगर-नाशिकमार्गे मुंबईतील ‎मंत्रालयावर १६ फेब्रुवारीला धडकणार आहे, ‎अशी माहिती आशिष वाकोडे यांनी दिली.‎ दररोज ३० किमी अंतर पायी कापले जाणार‎आहे. वाटेत जागोजागी लाँगमार्चमध्ये‎ सहभागी आंदोलकांची निवासाची आणि‎ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.‎

    Somnath Suryavanshi death case, long march from Parbhani to Mantralaya; will reach Mumbai on February 16

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस