• Download App
    दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वतंत्र!!; शिवसेनेकडून प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान!!; भाजपचे टीकास्त्र Shiv Sena insults the martyrs of Maharashtra on Prabodhankar's death anniversary ..

    दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र स्वतंत्र!!; शिवसेनेकडून प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा अपमान!!; भाजपचे टीकास्त्र

    प्रतिनिधी

    मुंबई : देशाला स्वातंत्र्य नेमके केव्हा मिळाले यावरून संपूर्ण देशात वाद-विवाद सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्याला महाराष्ट्र दोन वर्षे झाली तो संदर्भ घेत महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला, अशी उपमा देऊन संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान केला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र भाजपने त्यांचे वाभाडे काढले आहेत.Shiv Sena insults the martyrs of Maharashtra on Prabodhankar’s death anniversary ..


    शिवसेना खासदार संजय राऊत यांचे कंगना रनौतला प्रत्युत्तर, ‘चीन सीमेमध्ये घुसलाय, मोदी सरकार दुसरा गाल पुढे करतंय!’


    संजय राऊत यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुण्यतिथी दिवशीच संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांचा अपमान केला आहे. महाराष्ट्राची अस्मिता आणि मराठी भाषेच्या जीवावर राजकीय पोळ्या भाजणारे दिवसेंदिवस खालच्या थराला जात आहेत हेच खरे, असे टीकास्त्र सोडणारे ट्विट महाराष्ट्र भाजपने केले आहे.

    संजय राऊत यांनी नाशिक मधल्या कार्यक्रमात बोलताना, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला आहे. महाराष्ट्र दोनच वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला आहे. महाराष्ट्रात भगवा फडकला आहे. त्यांना जे जमले नाही ते शिवसेनेने करून दाखवले, असे वक्तव्य केले होते. त्याला महाराष्ट्र भाजपने ट्विटरवरून सडेतोड उत्तर दिले आहे.

    Shiv Sena insults the martyrs of Maharashtra on Prabodhankar’s death anniversary ..

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार रिंगणात; पक्षाच्या कोअर कमिटीचे मोठे निर्णय

    Supriya Sule : शरद पवार यांच्या राज्यसभेसाठी सुप्रिया सुळेंची संजय राऊतांशी चर्चा

    ‘Supreme Court : न्यायिक भ्रष्टाचार’ प्रकरण असलेल्या NCERT पुस्तकाच्या विक्रीवर बंदी; CJI म्हणाले होते- न्यायपालिकेला बदनाम करण्याची परवानगी कोणालाही नाही