• Download App
    पवार कुटुंबात नुरा कुस्ती, 4 जून नंतर शरद पवारांना भाजपसोबत जावे लागेल; प्रकाश आंबेडकरांचे भाकीत!! Sharad pawar have to with the BJP after loksabha results, claims prakash ambedkar

    पवार कुटुंबात नुरा कुस्ती, 4 जून नंतर शरद पवारांना भाजपसोबत जावे लागेल; प्रकाश आंबेडकरांचे भाकीत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेणे किंवा दोन राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी एकमेकांनी भेट घेणे यात विशेष काही नाही. पवार कुटुंबात नुरा कुस्ती म्हणजेच खोटा संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनाही भाजपबरोबर जावे लागेल, असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरे हे देखील भाजपबरोबर जातील अशी ही “भविष्यवाणी” केली. Sharad pawar have to with the BJP after loksabha results, claims prakash ambedkar

    टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर म्हणाले :

    4 जूनच्या निकालानंतर उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जाणार आहेत. उद्धव ठाकरेच नाही, तर शरद पवारही भाजपसोबत जातील. राज्यातील परिस्थितीच अशी आहे, की उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरेच कशाला??, शरद पवारही भाजपसोबत जातील. शरद पवार यांची काहीही गॅरेंटी देता येत नाही. ते इंडी आघाडीत राहतील याची गॅरेंटी नाही. काहीही कारण काढून ते जातील. दोघेही जातील. यात नवीन काहीच नाही.



     

    उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले. पण त्यांचे काँग्रेसशी पटलं नाही. त्यांना शरद पवार गटाचा पाहिजे तसा उपयोग झाला नाही. त्यामुळे राजकीय पुनर्वसनासाठी आणि त्यांच्यामागे जो ससेमिरा लावला आहे, त्यातून वाचायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत जाणं भाग आहे.

    बारामतीतील मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजितदादांच्या कुटुंबीयांना भेटल्या होत्या. त्याही बातम्या होत्या. त्यामुळे सुनील तटकरे हे शरद पवार यांना भेटले असतील तर त्यात नवल नाही. पवार कुटुंबात नुरा कुस्ती म्हणजे खोटा संघर्ष सुरू आहे निवडणुकीनंतरची कुटुंबातील ही नुरा कुस्ती कुठपर्यंत जाईल हे बघायचं राहिलं आहे.

    Sharad pawar have to with the BJP after loksabha results, claims prakash ambedkar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जोतिबा डोंगर परिसरातील जंगल पुन्हा ‘दख्खन केदारण्य’ या नावाने निर्माण करण्याचा संकल्प!

    समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण करायचा निर्धार!!

    पुरोहित संघातील 38 वर्षांची मक्तेदारी संपली, अध्यक्ष पदावरून सतीश शुक्लांची हकालपट्टी; चंद्रशेखर पंचाक्षरींकडे जबाबदारी; आता गोदावरी आरतीचा वाद संपण्याची अपेक्षा!!