• Download App
    Sharad pawar महाविकास आघाडीत आधी टाकला 85 चा खोडा, पण काँग्रेसने पाय सोडवून घेतला; आता पवारांनी केले हात वर!!

    MVA : महाविकास आघाडीत आधी टाकला 85 चा खोडा, पण काँग्रेसने पाय सोडवून घेतला; आता पवारांनी केले हात वर!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : आधी महाविकास आघाडीत पवारांनी टाकला 85 चा खोडा, पण काँग्रेसने चलाखीने पाय सोडवून घेतला. स्वतःचे 101 उमेदवार जाहीर केले, त्यावर आता महाविकास आघाडीत नेमके कोण किती जागा लढणार??, या प्रश्नावर पवारांनी हात वर केले!!

    बारामती विधानसभा मतदारसंघातून पवारांची चौथी पिढी योगेंद्र पवारांच्या रूपाने मैदानात आणल्यानंतर शरद पवारांनी महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाची हाक दिली. मात्र त्यावेळी त्यांना पत्रकारांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कोणते पक्ष नेमक्या किती जागा लढवणार??, हा सवाल केला त्यावर त्यांनी, “मलाच हे माहिती नाही”, असे सांगून हात वर केले.

    वास्तविक महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष समान जागा लढवतील अशी टूम काढून पवारांनीच 85 चा खोडा टाकला होता. संजय राऊत, जयंत पाटील, नाना पटोले हे पवारांना सिल्वर ओकवर भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनीच महाविकास आघाडीत तीन पक्ष प्रत्येकी 85 जागा लढवतील, असे तुम्ही जाहीर करून टाका. उरलेल्या जागांबाबत मित्र पक्षांशी चर्चा सुरू आहे, असे सांगा, अशी सूचना पवारांनी त्या नेत्यांना केली होती. त्यानुसार या सगळ्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन 85 चा फॉर्म्युला जाहीर केला, पण जयंत पाटलांनी कानात सांगून संजय राऊतांकडून ती बेरीज चुकवली. 255 ची बेरीज संजय राऊत यांनी 270 सांगितली. त्यामुळे महाविकास आघाडीतल्या तिढा वाढला.

    पण काँग्रेस नेत्यांनी अत्यंत चलाखीने पवारांचा “डाव” ओळखला. राहुल गांधींनी पर्सनली जागावाटपात लक्ष घातले. काँग्रेसने 101 जागांवर उमेदवार जाहीर करून टाकले. त्यानंतर पवारांनी आज महाविकास आघाडीत नेमके कोण किती जागा लढवणार??, या पत्रकारांनी विचारलेल्या सवालावर, “मलाच माहिती नाही”, असे सांगून हात वर केले.

    Sharad pawar again brought MVA in fix over seat sharing

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

    स्वतः अध्यक्ष राहिलेल्या आणि नातवाला अध्यक्ष केलेल्या पवारांना आता क्रिकेटमध्ये राजकीय व्यक्ती नको!!

    Maharashtra Govt : संस्थांनी दिलेला निधी वापरा, नाही तर परत द्या; राज्य शासनाचा 28 फेब्रुवारपर्यंत अल्टिमेटम