• Download App
    संजय राऊत म्हणतात, देशात युद्धसदृश्य परिस्थिती, कोरोनावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा । Sanjay Raut says, call a special session of Parliament to discuss the war-like corona situation

    संजय राऊत म्हणतात, ‘देशात युद्धसदृश परिस्थिती, कोरोनावर चर्चेसाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा!’

    Will the Congress leader protest against the Marathi-Kannada controversy dug up by Sanjay Raut? Karnataka BJP's question

    Sanjay Raut : कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढलेल्या ‘गंभीर परिस्थिती’वर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी सद्यस्थितीला ‘युद्धसदृश्य’ असे संबोधले आहे. ते म्हणाले की, सर्वत्र दहशत व तणाव आहे. महाराष्ट्रा हे कोरोना संसर्गाने सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. मागच्या काही दिवसांपासून येथे दररोज साठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. Sanjay Raut says, call a special session of Parliament to discuss the war-like corona situation


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या वेगाने वाढलेल्या ‘गंभीर परिस्थिती’वर चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी सद्यस्थितीला ‘युद्धसदृश्य’ असे संबोधले आहे. ते म्हणाले की, सर्वत्र दहशत व तणाव आहे. महाराष्ट्रा हे कोरोना संसर्गाने सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. मागच्या काही दिवसांपासून येथे दररोज साठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.

    सद्य:परिस्थितीबद्दल संजय राऊत यांनी ट्विटरवर लिहिले की, ही एक अभूतपूर्व आणि जवळपास युद्धासारखी परिस्थिती आहे. सगळीकडे अस्वस्थता आणि तणाव आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही, लसीकरणही होत नाहीये! हे संपूर्ण गोंधळाचे वातावरण आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी संसदेचे किमान दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. जय हिंद!”

    दरम्यान, महाराष्ट्रात संचारबंदी लागू असूनही रुग्णसंख्या कमी झालेली नाही. राज्याने ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची केंद्राकडे मागणी केल्यावर त्यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. ऑक्सिजनचा महाराष्ट्राला सातत्याने पुरवठा व्हावा यासाठी केंद्राने विशेष तरतूद केली आहे. एवढेच नाही, तर रेमडेसिव्हीर उत्पादक कंपन्यांना उत्पादनात वाढ करण्याचेही निर्देश दिले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संचारबंदीतूनही रुग्णसंख्या कमी होत नसल्याने कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकतात.

    Sanjay Raut says, call a special session of Parliament to discuss the war-like corona situation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!