• Download App
    भाजपचे सारे नेते चांगलेच, भाजप-शिवसेनेतील हिंदुत्वाचा धागा कायम – संजय राऊत Sanjay Raut praises BJP leaders

    भाजपचे सारे नेते चांगलेच, भाजप-शिवसेनेतील हिंदुत्वाचा धागा कायम – संजय राऊत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांमुळे वातावरण खराब होत आहे. मूळ भाजपचे सदस्य असलेल्यांकडून कोणतीही बेताल वक्तव्ये केली जात नाहीत, असे सांगत भाजप आणि शिवसेनेतील हिंदुत्वाचा धागा कायम असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नमूद केले. Sanjay Raut praises BJP leaders

    देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, आशीष शेलार आदींकडून कधीही बेताल वक्तव्ये केली जात नाहीत. हे सर्व भाजपचे जुनेजाणते नेते आहेत; परंतु बाहेरून आलेल्यांमुळे भाजपमधील वातावरण खराब केले जात आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजप राजकीयदृष्ट्या वेगळे झाले असले, तरीही दोन्ही पक्षांतील हिंदुत्वाचा धागा कायम असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले.



    केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रकरणानंतर राज्यात शिवसेना विरुद्ध राणे असा वाद पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊत यांनी थेट भाजपवर हल्ला न चढवता भाजपमध्ये नव्याने आलेल्यांना लक्ष्य केले.

    Sanjay Raut praises BJP leaders

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही