• Download App
    जोधा-अकबर चित्रपटावरून झालेल्या दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांचे वॉरंट रद्द|Sambhaji Bhide's warrant canceled in riot case over Jodha-Akbar movie

    जोधा-अकबर चित्रपटावरून झालेल्या दंगल प्रकरणात संभाजी भिडे यांचे वॉरंट रद्द

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : शहरात २००८ मध्ये जोधा-अकबर या चित्रपटावरून झालेल्या दंगल प्रकरणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे पकड वॉरंट रद्द करत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे नेते बजरंग पाटील व अन्य ७० जणांचेही पकड वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर यांनी रद्द केले.Sambhaji Bhide’s warrant canceled in riot case over Jodha-Akbar movie

    सांगली शहरात २००८ मध्ये जोधा-अकबर चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद झाला होता. हा चित्रपट हिंदूविरोधी व हिंदूंच्या भावना दुखावणारा असल्याचे म्हणत शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी दंगल घडवली होती. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता.या घटनेनंतर संभाजी भिडे, नितीन शिंदे, बजरंग पाटील,



    सुनीता मोरे यांच्यासह सुमारे ९७ जणांविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीला संशयित गैरहजर राहात असल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी केस्तीकर यांनी काही संशयितांविरुद्ध पकड वॉरंट तर काहीजणांविरुद्ध जामीनपात्र वॉरंट काढले होते.

    न्यायालयाने भिडे यांना १५ हजार रुपये जातमुचलक्यावर वॉरंट रद्द करत जामीन मंजूर केला. माजी आमदार नितीन शिंदे यांना २०० रुपये दंड केला तर बजरंग पाटील व सुनीता मोरे व इतर दोघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची अनामत भरण्याचे आदेश देण्यात आले.

    १ फेब्रुवारी रोजी त्यांनी जामीन घेऊन पुन्हा न्यायालयात हजर राहायचे आहे. या प्रकरणातील संशयितांना न्यायालयाकडून वॉरंट बजाविण्यात आल्यानंतर संभाव्य अटक टाळण्यासाठी ७० संशयितांनी न्यायालयात हजर होत वॉरंट रद्दसाठी अर्ज सादर केला होता.

    Sambhaji Bhide’s warrant canceled in riot case over Jodha-Akbar movie

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस