• Download App
    Prakash Ambedkar खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा

    खासगीकरण आणि कंत्राटी पद्धतीमुळे शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले; प्रकाश आंबेडकराचा दावा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देशात संविधानानुसार आरक्षण असले तरी सध्या मात्र शिक्षणातले आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण संपले आहे. कारण शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण झाले आणि नोकऱ्या कंत्राटी पद्धतीने दिल्या जातात म्हणून तिथे आरक्षण शिल्लक राहिलेले नाही, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्याचवेळी त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडताना, भाजप म्हणत आहे धर्म संकटात आहे, पण ओबीसींनो समजून घ्या, धर्म संकटात नाही, तर ओबीसींचे आरक्षण संकटात आहे, असे सांगितले.

    मराठवाड्यातील नांदेडमध्ये आयोजित केलेल्या भटके विमुक्त ओबीसी एल्गार महासभेमध्ये ते बोलत होते. ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आज शिक्षणातले आरक्षण हे संपलेले आहे. नोकरीतले आरक्षण संपलेले आहे. कारण की, शिक्षण क्षेत्राचे खाजगीकरण केले आहे. नोकऱ्या ह्या कंत्राटी पद्धतीने दिल्या जात आहे. आता जे आरक्षण आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगर पालिकापुरते राहिलेले आहे.

    ज्या प्रकारे बाहुबली चित्रपटात कटप्पाने पाठीत खंजीर खुपसून बाहुबलीचा जीव घेतला. त्याचप्रमाणे बहुसंख्य ओबीसी जो बाहुबली आहे, त्याच्या पाठीत भाजपने खंजीर खुपसला. आपला शत्रू भाजप, महायुती आणि प्रस्थापित पक्ष आहेत, हे ओबीसींनी ओळखावे, असे ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांनी सांगितले.

    Reservation in education and jobs has ended; Prakash Ambedkar claims

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    फ्रंटिअर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून महाराष्ट्र बनणार ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा!!

    विद्यार्थ्यांना दिलासा; बार्टी, सारथी, महाज्योती, आर्टी आदी संस्थांच्या फेलोशिपच्या जाहिराती येत्या 10 दिवसांत!!

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, पण ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!