• Download App
    पवारांपाठोपाठ राऊत सरसावले; गोवा - यूपीत 100% परिवर्तन होईल म्हणाले!!|Raut moved after Pawar; Goa - UP will change 100% !!

    पवारांपाठोपाठ राऊत सरसावले; गोवा – यूपीत १००% परिवर्तन होईल म्हणाले!!

    प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची राजकीय शिष्टाई गोव्यात फसली. त्यांनी मांडलेला महाविकास आघाडीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गोवा, उत्तर प्रदेश आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये निवडणूक लढविण्याचे जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांना देखील पुन्हा उत्साह आला आहे.Raut moved after Pawar; Goa – UP will change 100% !!

    त्यांनी गोवा आणि उत्तर प्रदेशात 100% परिवर्तन होईल लिहून ठेवा असे वक्तव्य केले आहे.गोव्यात शिवसेना 9 जागा लढवणार आहे तर उत्तर प्रदेशात 50 जागा लढवणार आहे, असे संजय राऊत यांनी जाहीर केले आहे.



    शरद पवार यांनी मात्र पत्रकार परिषदेत समाजवादी पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस युती करून निवडणूक लढवेल, असे जाहीर केले आहे. परंतु त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांचा आकडा जाहीर केलेला नाही.

    फक्त मणिपूरमध्ये काँग्रेस समवेत राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागा लढवेल एवढेच शरद पवार म्हणाले आहेत. गोवा आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेस नेमक्या किती जागा लढवेल याचा आकडा शरद पवार यांनी जाहीर केलेला नाही. त्याआधी संजय राऊत यांनी मात्र गोव्यात 9 जागा आणि उत्तर प्रदेशात 50 जागा शिवसेना लढवणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे.

    उत्तर प्रदेशात भाजपमधून मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्यानंतर अन्या तीन आमदारांनी देखील राजीनामा दिला आहे. यावरून काही लोकांना सत्ता परिवर्तनाचे वारे लवकर कळते असे संजय राऊत म्हणाले.

    Raut moved after Pawar; Goa – UP will change 100% !!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू ठरले लढवय्ये; पण शरद पवार ठरले पुतण्या पुढे शरणागत!!

    शरद पवारांच्या पक्षाचे विलीनीकरण नव्हे; तर स्व हस्ते वाताहत!!; यशवंतरावांचे “भाग्य” सुद्धा वाट्याला नाही आले!!

    Adani-Pawar : सुप्रिया सुळे म्हणाल्या- गौतम भाई मोठ्या भावासारखे, अदानी म्हणाले- शरद पवार माझे मार्गदर्शक, तर अजितदादा म्हणाले- मोठं झाल्यावर लोक टीका करतात