• Download App
    धंगेकरांचा विजय वैयक्तिक, काँग्रेसचा नव्हे!!; नाना काटेंमुळे चिंचवडात कलाटे पडले; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस - राष्ट्रवादीला डिवचले Prakash Ambedkar pinched Congress - NCP over kasba victory and chinchwad defeat

    धंगेकरांचा विजय वैयक्तिक, काँग्रेसचा नव्हे!!; नाना काटेंमुळे चिंचवडात कलाटे पडले; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला डिवचले

    प्रतिनिधी

    पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाल्यानंतर देशात परिवर्तनाची ही नांदी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. मात्र त्यांच्या या दाव्याचा फुगा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी फोडून टाकला आहे. Prakash Ambedkar pinched Congress – NCP over kasba victory and chinchwad defeat

    कसब्यात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचा विजय हा वैयक्तिक त्यांचा आहे. पक्षाचा नव्हे, अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला डिवचले आहे. त्याचबरोबर चिंचवड मध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे पडले ही धारणा चुकीची आहे.



    उलट राष्ट्रवादीने नाना काटे यांना उभे करून राहुल कलाटे यांना पाडले, असे तुम्ही का नाही म्हणत??, असा उलटा सवाल प्रकाश आंबेडकरांनी पत्रकारांना करून राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचले आहे. प्रकाश आंबेडकरांनी चिंचवड मध्ये येऊन राहुल कलाटे यांचा प्रचार केला होता. त्यामुळे त्यांनी आजही राहुल कलाटे यांचीच बाजू उचलून धरली. मात्र यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचून घेतले.

    रवींद्र धंगेकर यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीत विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आनंदाचे उधाण आले आहे. पुण्यातल्या मराठी माध्यमांनी देखील या आनंदाला खतपाणी घातले आहे.

    रवींद्र धंगेकर यांच्या सकट सर्वच नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आल्याचा दावा करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचा दाव्याचा फुगा दोनच वाक्यांमध्ये फोडून टाकला आहे.

    Prakash Ambedkar pinched Congress – NCP over kasba victory and chinchwad defeat

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पुरोहित संघातील 38 वर्षांची मक्तेदारी संपली, अध्यक्ष पदावरून सतीश शुक्लांची हकालपट्टी; चंद्रशेखर पंचाक्षरींकडे जबाबदारी; आता गोदावरी आरतीचा वाद संपण्याची अपेक्षा!!

    MNS-Thackeray : मनसे – ठाकरे गट युतीबाबत अमित ठाकरे यांचे सूचक वक्तव्य :दोन भावांनी बोललं पाहिजे, आम्ही बोलून काही फरक पडणार नाही

    Technical education institutes : आयआयटी सारख्या तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये डाव्या विचारसरणीचा शिरकाव? आयआयटी मुंबईतील प्राध्यापक अनुपम गुहा वादाच्या भोवऱ्यात