• Download App
    Prakash Ambedkar कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत

    Prakash Ambedkar :कुणबी मराठा खरे ओबीसी नाहीत; जरांगेंच्या मागणीचा ओबीसी आरक्षणाला धोका; प्रकाश आंबेडकरांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनोज जरांगेंनी ओबीसीतूनच मराठा आरक्षण हवे असल्याचा हट्ट धरला आहे. पण कुणबी मराठा हे खरे ओबीसी नव्हेत. त्यामुळे जरांगे यांच्या मागणीतून ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

    प्रकाश आंबेडकर म्हणाले :

    कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. कुणबी हे स्वतःला ओबीसी समजत असले तरीही विधिमंडळाच्या सभागृहात मी मराठ्यांसह आहे असं आमदार सांगतो. याचाच अर्थ तो आमदार धनगरांबरोबर, माळी समाजाबरोबर, वंजारी, लिंगायत, बंजारा या समाजाबरोबर नाही, तसंच तो तेली, तांबोळी, लोहार, सोनार यांच्याबरोबर तर अजिबात नाही, हे समजावून घ्या.

    ओबीसी आरक्षणाला 100 % धोका

    मी तुम्हाला जे सांगतो आहे ते लक्षात घ्या. ओबीसी आरक्षणाला धोका आहे. हा धोका 100 % आहे. निवडणूक झाल्यानंतर हा धोका निर्माण होईल हे विसरु नका. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा. विधीमंडळ सभागृहात 190 कुणबी मराठा आमदार आहेत, तर ओबीसी आमदार हे फक्त 11 आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाला 100 % धोका आहे.

    पवार आगीत तेल ओतताहेत

    मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद लावण्याचं काम राजकीय पक्ष करत आहेत. शरद पवारांचं स्टेटमेंट आलं महाराष्ट्राचा मणिपूर करु नका. त्यांचं हे वक्तव्य आगीत तेल ओतणारे आहे. उद्धव ठाकरेंची जी भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा आणि जागा वाढवून घ्या त्यानंतर मराठ्यांना ओबीसीत घेऊ आणि आरक्षणाकडे नेऊ. हे बोलणं चिथावणी देणारं आहे. अशी अनेक वक्तव्यं येत आहेत, ज्यातून चिथावणी मिळते आहे. मात्र जनतेचं कौतुक करेन की राजकीय मतभेदांमध्ये जनता पडत नाही.



     

    Prakash Ambedkar Kunbi maratha are not true OBC

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Sangeet Sannyasta Khadga : ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकावरून वाद पेटला, गौतम बुद्धांचा अवमान झाल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप

    jayant patil : जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपद सोडणार; शरद पवारांशी चर्चा करून 2 दिवसांत राजीनाम्याची शक्यता

    महापालिका + झेडपी निवडणुकांचा महायुतीचा खरा फॉर्म्युला; ठाकरे + पवार ब्रँड गुंडाळा, अख्खा महाराष्ट्र आपसांतच वाटून घ्या!!