• Download App
    लतादीदींच्या निधनानंतर ट्रोल करणाऱ्यांवर प्रकाश आंबेडकर संतापले, ट्रोलर्सचा केला निषेधPrakash Ambedkar angry over trolls after Latadidi's death, protests against trolls

    लतादीदींच्या निधनानंतर ट्रोल करणाऱ्यांवर प्रकाश आंबेडकर संतापले, ट्रोलर्सचा केला निषेध

     

    भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही तुफान गर्दी होती. आपल्या घरातीलच कुणी व्यक्ती गेली आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु समाजमाध्यमांवर काही जणांनी लतादीदींच्या मृत्यूनंतरही ट्रोलिंगचं घाणेरडं काम केलंय. यावर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.Prakash Ambedkar angry over trolls after Latadidi’s death, protests against trolls


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाल्याने अवघा देश शोकसागरात आहे. यानिमित्त दोन दिवस राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात येत आहे. त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी दिग्गज राजकारणी, सेलिब्रिटींपासून सामान्यांचीही तुफान गर्दी होती. आपल्या घरातीलच कुणी व्यक्ती गेली आहे, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. परंतु समाजमाध्यमांवर काही जणांनी लतादीदींच्या मृत्यूनंतरही ट्रोलिंगचं घाणेरडं काम केलंय. यावर वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला आहे.

    प्रकाश आंबेडकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, “काल समाजमाध्यमांवर लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही लोकांनी ट्रोल करण्याचं घाणेरडे काम केलंय. त्यांचा आंबेडकर कुटुंबियांकडून जाहीर निषेध करतो.”

    वास्तविक, असे सांगितले जाते की, लतादीदी हयात असताना त्यांनी आंबेडकरी गीते गाण्यास नकार दिला होता. यावरून त्या हयात असतानाही वाद होता. परंतु त्यांच्या निधनानंतरही काही जणांनी समाजमाध्यमांवर घाणेरडी ट्रोलिंग केली. यावरच प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिल्याचे बोलले जात आहे.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?