• Download App
    महाराष्ट्रात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; “असा” करा अर्जPolice recruitment process for 14956 posts in Maharashtra starts from 3rd November

    महाराष्ट्रात 14956 जागांसाठी पोलीस भरती प्रक्रिया 3 नोव्हेंबर पासून सुरू; “असा” करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात २०२२ आणि २०२१ मधील तब्बल १४ हजार ९५६ रिक्तपदांची भरती पोलीस विभागात करण्यात येणार आहे. Police recruitment process for 14956 posts in Maharashtra starts from 3rd November

    महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण १४ हजार ९५६ पदे भरली जाणार आहेत. ही भरती ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. याबाबतची माहिती policerecruitment2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली आहे.

    अटी व नियम

    • उमेदवाराला पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पद्धतीने policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.
    • अर्ज सादर करण्याचा कालावधी : ३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२
    • कोणताही उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू शकत नाहीत.
    • उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

    परीक्षा पद्धती 

    अर्ज करणाऱ्या उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणाऱ्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये १०० पैकी ४० % गुण मिळवणे अनिवार्य आहे.

    Police recruitment process for 14956 posts in Maharashtra starts from 3rd November

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    LPG Supply : 8 ते 10 दिवसांत गॅस पुरवठा सुरळीत; पंपांवर 61 रुपये लिटरने केरोसिन वाटप, व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

    एसटी महामंडळात लवकरच 17742 पदांची कंत्राटी भरती; नव्या 8300 बस देखील लवकरच एसटी महामंडळाच्या ताफ्यात!!

    गोदातीरी अंतर्नादचा सुरेल जल्लोष; १७८५ विद्यार्थ्यांच्या भव्य सादरीकरणाने नाशिककर मंत्रमुग्ध!!