काश्मीरबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा मोठा दावा! People of PoK would like to join India on their own Rajnath Singh
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्मीरबाबत नेहमीच तणाव असतो. आता केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, भारताने बळजबरीने पीओकेवर कब्जा करण्याची गरज नाही कारण काश्मीरचा विकास पाहिल्यानंतर तेथील लोकांना स्वतःच भारताचा भाग व्हायला आवडेल.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील स्थिती बरीच सुधारली आहे. ते पुढे म्हणाले की, येथे निश्चितपणे निवडणूक होणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी कोणतीही मुदत दिली नाही.
ते म्हणाले, ‘मला वाटते भारताला काही करावे लागणार नाही. जम्मू आणि काश्मीरमध्ये ज्या प्रकारे ग्राउंड परिस्थिती बदलली आहे, ज्या प्रकारे या प्रदेशात आर्थिक प्रगती होत आहे आणि ज्या प्रकारे शांतता परत आली आहे, मला वाटते की पीओकेचे लोक स्वत:हून याला भारतात समाविष्ट करण्याची मागणी करू लागतील.’
People of PoK would like to join India on their own Rajnath Singh
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसचे नेते पाहताहेत 2004 चे स्वप्न, पण त्यांना 1969 पाहायला नाही लागले म्हणजे मिळवलीन!!
- 4 जून नंतर काँग्रेसमध्ये पुन्हा पडणार फूट! प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा
- प्रज्वल रेवण्णा सेक्स स्कॅण्डल : देवेगौडा पुत्र आणि प्रज्ज्वल पिता एचडी रेवण्णा पोलिसांच्या ताब्यात!!
- कांद्यावरची निर्यात बंदी उठवली तरी विरोधकांना पोटदुखीच; फडणवीसांचा निशाणा!!