विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपला पंचाईत ही आहे की त्यांचे आमदार त्यांच्यासोबत राहतील याची काहीच त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे त्यांची पंचाईत झाल्याने भीती दाखवणे सुरु आहे. आमचे २५ आमदार बाहेर पडणार आहेत मग आम्ही काय वेडे आहोत का? पुन्हा एक माणूस आम्ही परत निवडून येऊ देणार नाही. Our MLAs cannot be divided, Jayant Patil’s claim
एवढे सोप्पे नाही राजीनामा द्यायचा आणि बाहेर पडायचे. जो महाविकास आघाडीतून बाहेर पडेल त्याला लोक सळो की पळो करून टाकतील. ते लोकांना काय सांगणार ? त्यामुळे अशी कुठलीही घटना घडणार नाही. उलट भाजप आमदार आमच्या सरकारवर खूष आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यावेळी भाजपच्या आमदारांना मोठा निधी दिला. फडणवीस यांनी जितका निधी दिला त्याच्यापेक्षा जास्त निधी आम्ही दिला आहे. तसे फोन करुन भाजप आमदार आम्हाला सांगत आहेत. त्यामुळे आमचे आमदार फुटणे शक्य नाही. जर फुटला तर तो परत विधानसभेत दिसणार नाही असा स्पष्ट इशारा दिला.
Our MLAs cannot be divided, Jayant Patil’s claim
महत्त्वाच्या बातम्या
- कुटुंबातील व्यक्तींकडूनच ११ वर्षाच्या चिमुरडीवर सामूहिक बलात्कार
- युक्रेनमध्ये अडकलेल्या बांगलादेशींची भारताकडून सुटका
- गोव्यात भाजप सरकारच्या शपथविधी जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मान्यवर मंडळींची उपस्थिती
- अभिनेत्रीपाठोपाठ बॅले डान्सरचाही मृत्यू; रशियाचे युक्रेनवरील हल्ले अद्याप सुरूच
- कोरोनाबाबत सावधान ; मुंबईत वाढतायत कोरोनाचे रुग्ण; दक्षता घेण्याच्या आरोग्य सचिवांच्या सूचना