यवतमाळ पोलिसांकडे याबाबत पोस्टाने ही तक्रार करण्यात आली आहे. महिलेने लिखित तक्रारीत नमूद केले आहे की संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. Once again, a woman lodged a complaint with the police regarding Sanjay Rathore’s increase in difficulty and demand for physical comfort
विशेष प्रतिनिधी
यवतमाळ / मुंबई : एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणात शिवसेना नेते यांनी मंत्रिपद गमावले होते.मंत्रिपद गमावलेल्या शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आणखी एका महिलेने तक्रार केली आहे.
यवतमाळ पोलिसांकडे याबाबत पोस्टाने ही तक्रार करण्यात आली आहे. महिलेने लिखित तक्रारीत नमूद केले आहे की संजय राठोड यांनी माझ्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे.
त्यावेळी मंत्री असल्यामुळे तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तसेच आजही संजय राठोड माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करत लैंगिक छळ करतो, असं त्यात म्हटले आहे. यासोबत चित्रा वाघ यांनी या तक्रारीच्या पत्राचे दोन फोटोही पोस्ट केले आहे.
नक्की काय आहे जुन प्रकरण?
संबंधित तरुणीने 7 फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी भागातील इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर तरुणीच्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे आरोप झाले होते. विरोधकांनी वातावरण पेटवल्यानंतर राठोड काही काळ शांत राहिले होते.
काही दिवसांनी यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत घेत राठोड यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला होता, मात्र विरोधीपक्षांनी अधिवेशन चालू न देण्याची भूमिका घेतल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं संजय राठोड यांनी स्पष्ट केलं होतं. 28 फेब्रुवारीला मुंबईला येऊन त्यांनी राजीनामा दिला होता.
आता राठोड पुन्हा मंत्रिमंडळात परतणार?
तरुणीच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे राठोड यांनी तिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहण्याची भूमिका घेत राजीनामा दिला होता. मात्र आता पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याने संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद बहाल करण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Once again, a woman lodged a complaint with the police regarding Sanjay Rathore’s increase in difficulty and demand for physical comfort
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ला, पाश्चात्य गुप्तचर संस्थांकडून इशारा मिळूनही मनमोहन सिंग सरकारने दखल घेतली नाही, द स्पाय स्टोरीज पुस्तकात गौप्यस्फोट
- तब्बल ३९,९१० टनाच्या जहाजाचे झाले दोन तुकडे, २१ कमर्चारी मात्र वाचले
- माकप खासदाराने गळा आवळल्याने श्वास गुदमरला, राज्यसभेतील मार्शलांचा आरोप, अनिल देसाई यांनीही कडे तोडण्याचा केला प्रयत्न
- आंतरराष्ट्रीय पातळीवर असाही मोदीद्वेष, आक्रस्ताळ्या ममता बॅनर्जींना आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेसाठी आमंत्रण