प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात वाघांची संख्या लक्षणीय वाढली आहे. पेंच प्रकल्पात मूल्यांकनात उत्तम कामगिरी केली आहे. Number of tigers in Maharashtra from 312 to 390
मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची २० वी बैठक आज मंत्रालयात पार पडली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नागपूर येथून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते.
राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. त्याबद्दल आज झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
आज झालेल्या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. यामध्ये प्रामुख्याने ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हीटीसाठी भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलचे प्रस्ताव, रस्ते प्रकल्पांचे प्रस्ताव तसेच अन्य विकास कामांच्या प्रस्तावांचा समावेश होता. आजच्या बैठकीत १९ प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळास शिफारशीसाठी सादर करण्यात आले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते महाडाटा वेब पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला. प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता आदींसह वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
Number of tigers in Maharashtra from 312 to 390
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : लव्ह जिहाद हा तर हिंदु आणि ख्रिस्ती महिलांच्या गर्भावरील दहशतवादी हल्ला!!
- भावनेच्या भरात अंकुश काकडे बोलून गेले, असे पवार साहेब निर्णय मागे घ्या अन्यथा खेड्यातील लोक आत्महत्या करतील!!
- पवारांच्या निर्णयामागे घरातलेच असेल भांडण, तर बाहेरच्यांशी लढायला कशी मिळेल ताकद??
- Karnataka Election : ‘’आधी प्रभू श्रीरामाची अडचण होती आणि आता…’’ काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी साधला निशाणा!