• Download App
    Devendra Fadnavis आता फेक नरेटिव्ह चालणार नाही, राज्यात

    Devendra Fadnavis : आता फेक नरेटिव्ह चालणार नाही, राज्यात महायुतीचेच सरकार येणार, देवेंद्र फडणवीसांचे विधान

    Devendra Fadnavis

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Devendra Fadnavis आगामी विधानसभा निवडणुकीची तारीख आता काही दिवसांवर आली आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी आता जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांची नावेदेखील जाहीर करणे सुरू असून ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. यंदा महायुतीचे सरकारच येईल असा दावाही त्यांनी केला आहे.Devendra Fadnavis

    देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, हरियाणाबाबत सगळे पोलपंडित सांगत होते भाजपचा दारुण पराभव होणार. पण भाजपाला प्रचंड बहुमत मिळाले. त्यामुळे सकाळी टीव्हीसमोर बोलणारे दुपारी काय बोलू या संभ्रमात पडले होते, असे म्हणत त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला काही प्रमाणात यश मिळवता आले. फेक नरेटिव्हच्या भरवशावर त्यांनी यश मिळवले, असे ते म्हणाले.



    लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद झाला

    ते म्हणाले, राहुल गांधींनी आरक्षण कसे संपवणार याचा फॉर्म्युला सांगितला. नाना पटोले त्यांचीच री ओढत आहेत. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहाद हा महत्त्वाचा घटक होता. सगळी धार्मिक स्थळे आणि धर्मगुरू व्होट जिहादचा नारा देत होते. आता याचा फायदा होणार नाही. तसेच व्होट जिहादमुळे बहुसंख्य समाजाच्या लक्षात आले की मोदी नकोत म्हणून व्होट जिहाद करणार असेल तर मतपेटीतून उत्तर देता येईल. त्यामुळे फेक नरेटिव्ह आता चालणार नाही.

    लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

    लाडकी बहीण योजनेबाबत मी हे सांगू इच्छितो की आमच्या विरोधकांचं कन्फ्युजन बघा. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कोलमडणार, निवडणुकीनंतर योजना बंद होणार. दुसरीकडे तेच भाषणांमध्ये सांगतात की, हे 1500 रुपये देतात आम्ही निवडून आलो तर 2000 रुपये देऊ. यांच्याकडे खजिना आहे का? पैशांचं झाड आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

    Now the fake narrative will not work said Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Shinde : शिवसेना हिंदूहृदय सम्राटांची, टोमणे सम्राटांची नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

    Fadnavis : फडणवीस म्हणाले- पालिकेच्या निवडणुका नसत्या तर इतका विरोध झाला नसता; उद्धव ठाकरेंच्या विरोधामागे राजकारणच!

    Manisha Kayande : उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्या विचारसरणी पूर्णपणे वेगळ्या – मनीषा कायंदे