• Download App
    Raj Thackeray महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही

    Raj Thackeray : महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार – राज ठाकरे

    Raj Thackeray

    सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    जम्मू-काश्मीर : Raj Thackeray महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिली पासून लादलेली हिंदी भाषेची सक्ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकारामुळे आणि पाठपुराव्यामुळेच हटली ! यासाठी तमाम महाराष्ट्रसैनिकांचं आणि महाराष्ट्रातील जनतेचं मनापासून अभिनंदन. सरकारने आधी विचार करून निर्णय घेतला असता तर आज माघार घेण्याची वेळ आली नसती. असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे.Raj Thackeray

    याचबरोबर ”ज्या महाराष्ट्राने अवघ्या देशावर राज्य केलं पण ते करताना कधी दुसऱ्या प्रांतावर मराठी लादली नाही , त्या प्रांतावर तुम्ही हिंदी भाषेची सक्ती कसली लादत होतात? यातून नक्की काय साध्य करायचं होतं?” असा सवालही केला आहे.



    तर ”असो, ही सक्ती मागे घेतली हे उत्तम झालं. पण या सक्तीच्या विरोधात महाराष्ट्रातील सगळ्या विचारधारांचे लोकं उभे राहिले याबद्दल सर्वांचे अभिनंदन.” असंही राज ठाकरेंनी बोलून दाखवलं.

    याचबरोबर ”मराठी माणूस जर असाच भाषेसाठी किंवा महाराष्ट्राच्या विरोधात कुरघोड्या करणारांच्या विरोधात असाच उभा राहिला तर काय बिशाद आहे कोणाची मराठी माणसाला गृहीत धरण्याची. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर कायम मराठी माणूस आणि भाषेसाठी उभी राहिली आहे आणि राहील फक्त यावेळेस दाखवलेली एकजूट कायम दिसू दे. सरकरने हा निर्णय मागे घेतला, त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण आलं, पण ठीक आहे निर्णय घेतला यासाठी सरकारला धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार !” अशा शब्दांत राज ठाकरेंनी सुनावलं आहे.

    No second or third language will work in Maharashtra only Marathi will work in Maharashtra said Raj Thackeray

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Raj Thackeray : सरकारने एकदाच काय तो दणका द्यावा, ‘मनसे’ नक्की सरकारच्यासोबत आहे – राज ठाकरे

    Bawankule : राज्यात 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती

    Fadnavis government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा