विशेष प्रतिनिधी
पुणे : सुनेत्रा पवारांचा राज्यसभा खासदारकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीतल्या बाकीचे कोणी नेते हजर नव्हते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट करा खुलासा केला. महायुती मधल्या पक्षांच्या नेत्यांच्या समन्वयांमधूनच सुमित्रा पवारांची उमेदवारी जाहीर केली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या असे अजित पवारांनी सांगितले. No problem in mahayuti over sunetra pawar’s rajyasabha candidature
महाराष्ट्र विधानसभेत एका बाजूला 200 पेक्षा जास्त आमदार आणि दुसऱ्या बाजूला सत्र 70 – 75 आमदार होते. त्यामुळे राज्यसभेची निवडणूक बिनविरोधच होणार होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कालच सांगितले होते. त्यांनी देखील महायुती राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला होता, असे अजित दादांनी स्पष्ट केले.
मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती अमोल काळे यांचे निधन झाल्याने त्यांना नाशिकला अस्थिविसर्जनासाठी जायचे होते. त्यामुळे ते सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरायला आले नव्हते. त्यांच्या वर दुःखद प्रसंग आला असताना त्यांना राज्यसभेचा फॉर्म भरायला बोलावणे योग्य वाटले नाही, असा खुलासा अजित पवारांनी केला. छगन भुजबळांच्या नाराजीचे वृत्त देखील अजित पवारांनी फेटाळून लावले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाने सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित केली त्यात छगन भुजबळ होते असा खुलासाही त्यांनी केला.