• Download App
    करुणा शर्मा मुंडे प्रकरणाची राष्ट्रवादीला करून दिली आठवण NCP was reminded of the Karuna Sharma Munde case

    करुणा शर्मा मुंडे प्रकरणाची राष्ट्रवादीला करून दिली आठवण

    प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा दिलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा 354 कलमानुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठा राजकीय बवाल उभा केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले विचारवंत, लिबरल कार्यकर्ते गप्प असताना हेरंब कुलकर्णी यांनी मात्र राष्ट्रवादीला करुणा शर्मा मुंडे प्रकरणाची आठवण करून दिली आहे. NCP was reminded of the Karuna Sharma Munde case

    आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर हेरंब कुलकर्णी यांनी राष्ट्रवादीला एक आठवण या शीर्षकाने एक पोस्ट केली आहे. ती अशी :

    राष्ट्रवादीसाठी एक आठवण

    जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेला गुन्हा हा महाराष्ट्रातील राजकारणाचा राजकीय स्तर अधिक तळाकडे ढकलणारा आहे, त्याचा निषेधच आहे.

    पण आज राष्ट्रवादीचे सारे नेते ज्या सात्विक संतापाने खोटा गुन्हा कसा या विषयावर अस्वस्थ होऊन बोलत आहेत ते बघताना मला करुणा मुंडे आठवल्या. राष्ट्रवादीचेच धनंजय मुंडे यांच्या गावात त्या पत्नीच्या नात्याने गेल्या तेव्हा त्यांच्या गाडीत पिस्तुल टाकली गेली. समोरच्या अनोळखी महिला कोण आहेत हे माहिती नसताना त्यांच्यावर त्या महिलांनी थेट अट्रोसिटी टाकली गेली.

    त्या १४ दिवस तुरुंगात होत्या. स्वतःच्या पत्नीवर इतक्या खालच्या पातळीवर खोटे गुन्हे टाकणाऱ्या व त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या या वर्तनाविषयी राष्ट्रवादी चा एकही नेता तेव्हा बोलला नाही किंवा केसेस मागे घेण्याविषयी सांगितले नाही आणि हेच आज सारे नेते खोटे गुन्हे या विषयावरून नैतिक मुद्दे मांडत आहेत.

    फक्त त्या प्रसंगांची आठवण

    – हेरंब कुलकर्णी

    NCP was reminded of the Karuna Sharma Munde case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना