विशेष प्रतिनिधी
मुंबई : अलिबाग तालुक्यातील कोर्लई गावाच्या सरपंचांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि रवींद्र शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी 19 बंगले आपल्या नावावर करण्यास संदर्भातले पत्रे लिहिली आहेत. ती पत्रे जानेवारी आणि मी 2019 मध्ये लिहिली आहेत. Name the 19 bungalows: Letter from Rashmi Thackeray, Manisha Vaikar to Sarpanch of Korlai village !!; Approved remarks and seal of Gram Panchayat too !!
याबाबतची कार्यवाही मंजूर अशा स्वरूपाचा शेरा देखील सरपंचांनी त्यावर मारला आहे. हे पत्रच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हॅण्डल वरून शेअर केले आहे.
कोर्लई गावातील अन्वय नाईक यांच्या जमिनीवरचे त्यांचे 19 बंगले आपण खरेदी केले असून त्यांच्या गट क्रमांकासह आपल्या नावावर करावेत, असा विनंती अर्ज रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांनी केल्याचे दिसून येते. यासाठी त्यांनी हेमंत शांताराम पाटील यांना अखत्यारी (मुखत्यारी) दिल्याने त्यांचे नाव पत्रामध्ये पहिले आहे. या पत्रावर कुर्लई गावच्या ग्रामपंचायतीचा शिक्का आणि “मंजूर” असा सरपंचांनी शेरा मारल्याचे ही दिसत आहे.
Name the 19 bungalows: Letter from Rashmi Thackeray, Manisha Vaikar to Sarpanch of Korlai village !!; Approved remarks and seal of Gram Panchayat too !!
महत्त्वाच्या बातम्या
- विहिरी वरील स्लॅब तुटुन पाण्यात बुडाल्याने १३ जणांचा मृत्यू; उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात भीषण दुर्घटना
- तुम्हीही प्या आणि त्यांनाही पाजा : पोलिस अधिकाऱ्याला बारमध्ये कोका कोलाचे १०० कॅन वाटण्याचे दिले आदेश
- महाराष्ट्रात चुंबाचुंबी मात्र तेलंगणातील कॉँग्रेसच्या कट्टर विरोधकाला मुंबईत पायघड्या, उध्दव ठाकरेंनी केला तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना फोन
- पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली राधा स्वामी डेराच्या प्रमुखांची भेट