वृत्तसंस्था
मुंबई : Mumbai Airport देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या मोठ्या वर्दळीचा गैरफायदा घेत होणारी तस्करी रोखण्यासाठी सीमा शुल्क विभागाने 4 ते 11 फेब्रुवारी 2026 दरम्यान धडक कारवाई केली. या सात दिवसांच्या विशेष मोहिमेत कोट्यवधी रुपये किमतीचे सोने आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी तस्करी करणाऱ्या 8 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विमानतळावरील कडक सुरक्षा व्यवस्था आणि तपासणी यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तस्करीचे हे मोठे रॅकेट उघडकीस आले असून, या कारवाईमुळे तस्करांचे धाबे दणाणले आहेत.Mumbai Airport
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम झोन-3 ने केलेल्या धडक कारवाईत तब्बल 18 कोटींहून अधिक किमतीचा अवैध ऐवज जप्त करत आठ प्रवाशांना बेड्या ठोकल्या आहेत. या विशेष मोहिमेत 16.7 कोटी रुपयांचे अमली पदार्थ, 38 लाख रुपयांचे हिरे, 15 लाख रुपयांचे सोने आणि 1.13 कोटी रुपयांचे परकीय चलन असा एकूण मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सीमा शुल्क विभागाने विविध प्रकरणांमध्ये संशयास्पद प्रवाशांची कसून तपासणी करून तस्करीचे हे मोठे प्रयत्न हाणून पाडले आहेत.Mumbai Airport
जप्त करण्यात आलेले तस्करीतील साहित्य
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने तस्करीविरोधी कारवाईचा फास अधिक आवळला असून, एका धडक मोहिमेत तब्बल 18 कोटींहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 16.756 कोटी रुपये किमतीचे 16.756 किलो ‘हायड्रोपोनिक वीड’ (अंमली पदार्थ), 38.28 लाख रुपयांचे नैसर्गिक व लॅब-ग्रोउन हिरे, 15.24 लाख रुपयांचे 104 ग्रॅम सोने आणि 1.13 कोटी रुपयांचे परकीय चलन अशा मोठ्या साठ्याचा समावेश आहे. या सर्व प्रकरणांत संबंधित प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस आणि कस्टम्स कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून, विमानतळावरील तस्करी रोखण्यासाठी तपास यंत्रणांनी आपली पाळत अधिक तीव्र केली आहे.
Mumbai Airport Customs Seize Drugs & Valuables Worth ₹18 Cr; 8 Arrested
महत्वाच्या बातम्या
- नारी तू नारायणी’ परिषदेचे २१ फेब्रुवारीला पुण्यात आयोजन; महिलांच्या आत्मनिर्भरतेवर होणार विचारमंथन
- Tarique Rahman : बांगलादेशी पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप
- महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे “वजीर” बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी “प्यादी”!!
- Canada : कॅनडाने 2025 मध्ये 2,800 भारतीयांना बाहेर काढले, 6,500 भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी