विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात जोरदार पावसाने दाणादाण उडविली असून घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी आपत्ती व्यवस्थानाची पथके रवाना केली आहेत. Migration of 200 citizens from Ramanand area of Kolhapur
रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. महापालिकेच्या आपत्ती दलाकडून पावसाच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचे रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली आहे. रामानंद परिसरातील ५० कुटुंबांचे स्थलांतर केले आहे.
- कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण
- अनेकांच्या घरात पावसाचे पाणी
- सुटकेसाठी आपत्ती व्यवस्थानाची पथके रवाना
- रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झाली
- रामानंद परिसरातील नागरिकांचे स्थलांतर
- ५० कुटुंबांचे स्थलांतर केले
Migration of 200 citizens from Ramanand area of Kolhapur