विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या पाहता राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाचे विलिनीकरणं सरकारमध्ये करून घ्यावे, असे आवाहन भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.Merger of ST To be done in government : Gopichnd padalkar
ते म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब जी यांना कळकळीची विनंती आहे की,गेल्या ६ महिन्यात २७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे त्यांची कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यांच्या सोबत घाणेरडं राजकारण करणं बंद करा व त्वरीत एसटीचे विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करा. अन्यथा गंभीर परिणामास सामोरे जाण्याची तयारी ठेवा.
- एसटीचे विलिनीकरण सरकारमध्ये करावे
- सहा महिन्यात २७ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या
- कर्मचाऱ्यांची कुटुंबे उघड्यावर, न्याय द्यावा
- कर्मचाऱ्यांसोबत घाणेरडे राजकारण बंद करा
Merger of ST To be done in government : Gopichnd padalkar