प्रतिनिधी
बीड : Massajog murder case मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या झाली होती. या घटनेनंतर ८१ व्या दिवशी सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक झालेली असून कृष्णा आंधळे फरार आहे.Massajog murder case
या प्रकरणात मकाेका लागू झाला आहे. न्यायालयीन चौकशीही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मस्साजोग ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांनी अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली.
लांबलचक आरोपपत्र आरोपींना वाचवण्यासाठी : ॲड. आंबेडकर
मस्साजोग प्रकरणातीलआरोपींना वाचवण्यासाठीच पोलिसांनी १०००पानांचे लांबलचक दोषारोपपत्र न्यायालयातदाखल केले असावे, असा आरोप वंचितबहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाशआंबेडकर यांनी केला. गुरुवारी ते हिंगोलीतआले होते. हिंगोली येथे वंचित बहुजनआघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीनंतरत्यांनी संवाद साधला. मस्साजोग प्रकरणातपोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले, तेवाचण्यासाठी न्यायालयाला आणिविधिज्ञांनाही वेळ नाही. त्यामुळे हजार पानांचेदोषारोपपत्र आरोपींना वाचवण्यासाठी दाखलकेले असावे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.
मस्साजोग प्रकरणात वाल्मीकच आका, दोषारोपपत्रात उलगडा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातसीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजारपानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोकान्यायालयात दाखल केले. आरोपींनी आधीखंडणी मागितली, त्यातूनच सुरक्षा रक्षकालामारहाण झाली व नंतर संतोष देशमुखांचाखून झाला अशी मांडणी सीआयडीनेदोषारोपपत्रात केली आहे. त्यामुळे याप्रकरणात दाखल तिन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळेदोषारोपत्र न करता, वाल्मीकसह ८जणांविरोधात एकच दोषारोपत्र दाखल केले.
सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४रोजी अपहरण करुन हत्या झाली होती.त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघालेहोते. या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हा नोंदझाले होते. सुरुवातीला केज पोलिस वत्यानंतर सीआयडी, एसआयटीकडे तपासगेला होता.
तीन गुन्ह्यांची लिंक अशी
२९ नोव्हेंबर२०२४ रोजी वाल्मीकने आवादा कंपनीला २कोटींची खंडणी विष्णू चाटेच्या मोबाईलवरुनमागितली होती. त्याच्या वसूलीची जबाबदारीचाटेसह सुदर्शन घुले व सहकाऱ्यांकडे दिलीहोती. यातूनच ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शनघुले हा सहकाऱ्यांसह मस्साजोगलाकंपनीच्या कार्यालयात गेला. तिथे सुरक्षारक्षकाला मारहाण केली. सुरक्षा रक्षकानेबोलावल्याने सरपंच संतोष देशमुख तिथेगेले. त्यांच्यात व घुलेमध्ये वाद झाला. याप्रकरणात घुलेविरोधात गुन्हा नोंद करण्यातआला. या रागातून घुले याने ९ डिसेंबरलाअपहरण करुन देशमुख यांची हत्या केली.अशी मांडणी सीआयडीने केली आहे.
Massajog murder case: Chargesheet filed on 81st day; Extortion, assault, murder linked to each other
महत्वाच्या बातम्या
- Nagpur एच एस ह्युसंग कंपनीची नागपूरात १७४० कोटींची गुंतवणूक; ४०० युवकांना रोजगार!!
- Manipur : मणिपूरच्या सात जिल्ह्यांतील लोकांनी शस्त्रे, दारूगोळा अन् बंदुका सुरक्षा दलांना सोपवल्या
- मुंबईतील डिफेन्स क्लबमध्ये ७८ कोटींचा घोटाळा!
- Hazaribagh :महाशिवरात्रीला झारखंडमध्ये दोन गटांत हिंसाचार, दगडफेक व जाळपोळीत अनेक जखमी