• Download App
    Massajog murder case मस्साजोग हत्याकांड: 81व्या दिवशी आरोपपत्र दाख;

    Massajog murder case : मस्साजोग हत्याकांड: 81व्या दिवशी आरोपपत्र दाख; खंडणी, मारहाण, खुनाची एकमेकांशी लिंक‎

    Massajog murder case

    प्रतिनिधी

    बीड : Massajog murder case मस्साजोग (ता.केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून हत्या झाली होती. या घटनेनंतर ८१ व्या दिवशी सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल केले. यात आतापर्यंत ८ आरोपींना अटक झालेली असून कृष्णा आंधळे फरार आहे.Massajog murder case

    या प्रकरणात मकाेका लागू झाला आहे. न्यायालयीन चौकशीही सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी मस्साजोग ग्रामस्थ व देशमुख कुटुंबीयांनी अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली.



    लांबलचक आरोपपत्र आरोपींना‎ वाचवण्यासाठी : ॲड. आंबेडकर‎

    मस्साजोग प्रकरणातील‎आरोपींना वाचवण्यासाठीच पोलिसांनी १०००‎पानांचे लांबलचक दोषारोपपत्र न्यायालयात‎दाखल केले असावे, असा आरोप वंचित‎बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश‎आंबेडकर यांनी केला. गुरुवारी ते हिंगोलीत‎आले होते. हिंगोली येथे वंचित बहुजन‎आघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीनंतर‎त्यांनी संवाद साधला. मस्साजोग प्रकरणात‎पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले, ते‎वाचण्यासाठी न्यायालयाला आणि‎विधिज्ञांनाही वेळ नाही. त्यामुळे हजार पानांचे‎दोषारोपपत्र आरोपींना वाचवण्यासाठी दाखल‎केले असावे, असे ॲड. आंबेडकर म्हणाले.‎

    मस्साजोग प्रकरणात वाल्मीकच आका, दोषारोपपत्रात उलगडा‎

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात‎सीआयडी व एसआयटीने गुरुवारी १ हजार‎पानांचे दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका‎न्यायालयात दाखल केले. आरोपींनी आधी‎खंडणी मागितली, त्यातूनच सुरक्षा रक्षकाला‎मारहाण झाली व नंतर संतोष देशमुखांचा‎खून झाला अशी मांडणी सीआयडीने‎दोषारोपपत्रात केली आहे. त्यामुळे या‎प्रकरणात दाखल तिन्ही गुन्ह्यांचे वेगवेगळे‎दोषारोपत्र न करता, वाल्मीकसह ८‎जणांविरोधात एकच दोषारोपत्र दाखल केले.‎

    सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४‎रोजी अपहरण करुन हत्या झाली होती.‎त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले‎होते. या प्रकरणात तीन वेगवेगळे गुन्हा नोंद‎झाले होते. सुरुवातीला केज पोलिस व‎त्यानंतर सीआयडी, एसआयटीकडे तपास‎गेला होता.‎

    तीन गुन्ह्यांची लिंक अशी

    २९ नोव्हेंबर‎२०२४ रोजी वाल्मीकने आवादा कंपनीला २‎कोटींची खंडणी विष्णू चाटेच्या मोबाईलवरुन‎मागितली होती. त्याच्या वसूलीची जबाबदारी‎चाटेसह सुदर्शन घुले व सहकाऱ्यांकडे दिली‎होती. यातूनच ६ डिसेंबर २०२४ रोजी सुदर्शन‎घुले हा सहकाऱ्यांसह मस्साजोगला‎कंपनीच्या कार्यालयात गेला. तिथे सुरक्षा‎रक्षकाला मारहाण केली. सुरक्षा रक्षकाने‎बोलावल्याने सरपंच संतोष देशमुख तिथे‎गेले. त्यांच्यात व घुलेमध्ये वाद झाला. या‎प्रकरणात घुलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात‎आला. या रागातून घुले याने ९ डिसेंबरला‎अपहरण करुन देशमुख यांची हत्या केली.‎अशी मांडणी सीआयडीने केली आहे.‎

    Massajog murder case: Chargesheet filed on 81st day; Extortion, assault, murder linked to each other

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bawankule : राज्यात 80 अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; उपजिल्हाधिकाऱ्यांना बढती

    Fadnavis government : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; मत्स्य व्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रासारखाच दर्जा

    अमेरिकेचे उपाध्यक्ष भारतात, भारताचे पंतप्रधान सौदी अरेबियात; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य मोठे!!