विशेष प्रतिनिधी
पुणे : Tamhini Ghat लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटातील अवघड वळणावर अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले.Tamhini Ghat
माणगाव पोलीस स्टेशन हद्दीत ताम्हीणी घाटात परपल ट्रॅव्हल्सची खाजगी बस पलटी झाली. जाधव कुटुंबीय लोहगाव पुणे येथून बिरवाडी महाड येथे लग्न समारंभास जात असताना ताम्हीणी घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाली. यामधे २ पुरुष व ३ महिला अशा एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. २७ जखमी लोकांना बाहेर काढून माणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी काम करत आहेत.
संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव यांच्यासह एका अनोळखी पुरुषाचा अपघातात मृत्यू झाला आहे.
Marriage party bus met with an accident at Tamhini Ghat, five died
महत्वाच्या बातम्या
- Kulgam : कुलगाममध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, 5 दहशतवादी ठार
- Mukesh Rajput : भाजपचे दोन खासदार पायऱ्यांवरून पडले; मुकेश राजपूत आयसीयूमध्ये दाखल, सारंगींवरही उपचार सुरू
- Shivraj Singh Chouhan : ‘राहुल गांधी विरोधी पक्षनेते होण्याच्या लायक नाहीत’, शिवराज सिंह चौहान यांचा हल्लाबोल!
- Good News : कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार!