• Download App
    Manoj Jarange 17 छोट्या समूदायांचा ओबीसींमध्ये समावे

    Manoj Jarange : 17 छोट्या समूदायांचा ओबीसींमध्ये समावेश करण्यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा आक्षेप!!

    manoj jarange

    विशेष प्रतिनिधी

    बीड : Manoj Jarange  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकारने 17 छोट्या – मोठ्या जात समूहांचा ओबीसीमध्ये समावेश केला. शिंदे फडणवीस मंत्रिमंडळाने कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय घेऊन त्या निर्णयाच्या अंमलबजावणीची अधिसूचनाही काढली. पण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे  ( Manoj Jarange )  यांनी सरकारच्या या निर्णयावर शुभेच्छा 17 जातींना ओबीसींमध्ये घालताना तुम्ही महाविकास आघाडी कडून लिहून घेतले होते का??, मग फक्त मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला महाविकास आघाडी कडून लिहून घ्यायला का सांगता??, मराठे ओबीसींमध्ये आले, तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागतो म्हणता, मग 17 जात समूह ओबीसींमध्ये घातले तेव्हा ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही का??, असा सवाल करून मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले.Manoj Jarange



    आचारसंहिता लागेपर्यंत या सरकारच्या निर्णयाची वाट पाहणार नंतरच भूमिका जाहीर करणार असे जरांगे म्हणाले.

    मनोज जरांगे यांनी आज नगद नारायण गडावरून मोठमोठ्या डरकाळ्या फोडल्या. त्यांच्या तोंडी कचका दाखवतो आणि उलथापालथीची भाषा आली. आम्ही मराठा क्षत्रिय आहोत. आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही कुणाचे ऐकत नसतो. आमच्यावर अन्याय होतो आहे. मला चहूबाजूंनी घेरले आहे, असे सांगून जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन मराठा समाजाला केले.

    नगद नारायण गडावर बारा बलुतेदारांचा, सर्व अठरा पगड जातींचा दसरा मेळावा होईल, असे मनोज जरांगे यांनी सुरुवातीला जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांचे सगळे भाषण मराठा समाज केंद्रितच झाले. मराठा समाज कोणावर अन्याय करत नाही तो सगळ्या जाती जमातींना बरोबर घेऊन जातो, असे मनोज जरांगे म्हणाले.

    आपल्या समाजाच्या नाकावर टिच्चून जर कुठली निर्णय होत असतील, समाजातल्या लेकरांवर कोणी अन्याय करत असेल, तर आपण गप्प बसायचे कारण नाही. आपल्या समुदायासाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी यावेळी उलथापालथ करावीच लागेल. समाजाची शान वाढवण्यासाठी समोरच्याला गाडावाच लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

    आपण कर्माने क्षत्रिय आहोत. माझ्या एका शब्दाची चूक झाली तर सगळ्या समाजाला सहन करावे लागेल म्हणून मी गप्प बसतोय पण आपण इथून हाणत हाणत निघालो, तर गुजरात हरियाणा पानिपत कटक पर्यंत हाणत जाणारा हा समाज आहे, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.

    Maratha reservation activist Manoj Jarange objects to inclusion of 17 small communities in OBCs!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस