• Download App
    Manoj Jarange अतिवृष्टीच्या संकटातही मनोज जरांगे यांचे राजकारण,

    Manoj Jarange : अतिवृष्टीच्या संकटातही मनोज जरांगे यांचे राजकारण, महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा

    Manoj Jarange

    विशेष प्रतिनिधी

    धाराशिव :Manoj Jarange अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा संपूर्ण मंत्रिमंडळ पाहणी दौऱ्यावर असताना मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राजकारण सुरू केले आहे. सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे, तेवढी मदत द्यावी. अन्यथा महाराष्ट्र बंद करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.Manoj Jarange

    मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी पावसामुळे नुकसान झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील चिंचपुर ढगे व पिंपळगाव येथे भेट दिली. पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना म्हटले की, शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या साऱ्या गोष्टी गंभीर आहेत.Manoj Jarange



    सरकारने तात्काळ मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. तसेच नुकसानीचे पंचनामे करताना 50 टक्के, 60 टक्के असे करू नका, असे आवाहन जरांगे यांनी सरकारी अधिकाऱ्यांना केले आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे देखील जरांगे यांनी सांगितले.

    पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभे पीक आडवे झाले आहे, तर काही ठिकाणी तर पिकांचा अक्षरशः चिखल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकांच्या शेतांमध्ये तर कमरेएवढे पाणी साचले असून शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे सरकारकडून तातडीने मदतीची याचना शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

    Manoj Jarange’s politics even in the midst of heavy rain crisis, warning of Maharashtra shutdown

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Raj Thackeray : राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

    Maharashtra : राज्यातील पूरग्रस्त बाधित कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ; फडणवीस सरकारकडून मदत जाहीर

    CM Fadnavis : अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; पंचनाम्यासाठी ड्रोन व मोबाईल फोटोंना मान्यता