• Download App
    Manoj Jarange मनोज जरांगे यांची पुन्हा टोलवाटोलवी,

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांची पुन्हा टोलवाटोलवी, निवडून येऊ शकतात तेथेच उमेदवार उभे करणार म्हणत निर्णय नाहीच

    Manoj Jarange

    विशेष प्रतिनिधी

    अंतरवाली सराटी: Manoj Jarange राज्यात ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात त्याच मतदारसंघात उमेदवार उभे करायचे असा मोठा निर्णय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarange )  यांनी जाहीर केला.Manoj Jarange

    मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा बांधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी मोठी घोषणा केली आहे. जेथे निवडून येतील तेथेच उमेदवार उभे करूया. प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाची एक लाख मते आहेत. मात्र एका जातीच्या जीवावर मतदार निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी मी समीकरण जुळवतोय.



    जेथे उमेदवार देणार नाही तेथे जो पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देईल की तुमच्या मागण्या मान्य आहेत त्याला पाठिंबा द्यायचा. आपल्या विचारांचा असेल त्याला निवडून द्या.
    जरांगे म्हणाले, उमेदवार उभे केले नाहीत तर भाजपवाले खुश होतील. नाही उभे केले तर महाविकास आघाडीवाले खुश होतील. जेथे एससी आणि एसटी उमेदवार असतील तेथे उमेदवार द्यायचे नाही असेही त्यांनी सांगितले.

    जरांगे म्हणाले, आता ज्यांना पाहिजे त्यांनी उमेदवारी अर्ज भरावा. पण कोणाची ताकद आहे, कोण निवडून येऊ शकतो हे पाहू. 30 तारखेला याबाबत निर्णय घेणार आहे . त्यानंतर इतरांनी अर्ज मागे घ्यावे लागतील असेही त्यांनी सांगितले.

    Manoj Jarange Delays Decision Again: Talks of Fielding Candidates Only Where They Can Win, but No Final Call

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    महायुती की स्वबळ, हे ठरण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी नाशिक मध्ये घातले लक्ष

    prakash ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व करावे; आरक्षणवादी जनतेला सोबत घ्या, सवर्णांना मतदान करू नका

    CM Fadnavis : CM फडणवीस म्हणाले- राज्यासमोर वातावरण बदलाचा सर्वात मोठा प्रश्न; ऊर्जेच्या स्रोतांमध्ये परिवर्तन आवश्यक; ‘फ्लेक्स-इंजिन’नंतर सीएनजी मोठा बदल