प्रतिनिधी
पालघर : येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भीषण अपघात झाला. रॅलीदरम्यान विजेचा धक्का लागून दोघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर भाजले. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी विरारमधील मनवेलपाडा ते पालघरमधील कारगिलपर्यंत रॅली काढण्यात आली. रॅली आटोपून लोक घरी परतत असताना हा अपघात झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.Major accident in Ambedkar Jayanti procession in Palghar, 2 killed due to electric shock; 5 people died
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी देशभरात बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. त्याचवेळी जयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी पालघरमध्ये रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. रात्री 10.30 वाजता रॅली सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली आणि सांगता झाली. यानंतर लोक माघारी फिरू लागताच, त्यातील काही जणांचा वीज तारांना स्पर्श झाला.
त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. सुमित शिवाजी सुत (28) आणि रूपेश शरद सुर्वे (20) अशी त्यांची नावे आहेत. विजेचा धक्का लागल्याने त्यांना वाचवण्यासाठी गेलेले राहुल जगताप, उमेश कनोजिया, अस्मित कांबळे, सत्यनारायण पंडित, रोहित गायकवाड यांनाही विजेचा धक्का लागून ते गंभीर भाजल्याचे सांगण्यात येत आहे.
ताबडतोब या सर्वांना वसई विरारच्या महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी सुमित आणि रुपेश यांना मृत घोषित केले. त्याचवेळी जळालेल्या पाच तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Major accident in Ambedkar Jayanti procession in Palghar, 2 killed due to electric shock; 5 people died
महत्वाच्या बातम्या
- Ambedkar Jayanti : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांचे निळ्या रंगाशी नेमके नाते काय?
- राज्यघटनेच्या शिल्पकाराला, कोट्यवधीसाठी महामानव असलेल्या डॉ. आंबेडकरांना ४ दशके उशीरा
- राहुल गांधी – पवारांसह सर्व विरोधकांच्या तोंडी एकीची भाषा, पण मग बेकी होतीये तरी का??
- विधवांसाठी ‘गंगा भागीरथी’ असा शब्द वापरण्यावरून राष्ट्रवादीच्याच सुप्रिया सुळे व रूपाली चाकणकर आमनेसामने…