• Download App
    महायुतीचा सात जागांवर पेच, मात्र चर्चा अंतिम टप्प्यात!|Mahayuti has not decided on seven seats but the discussion is in the final stage

    महायुतीचा सात जागांवर पेच, मात्र चर्चा अंतिम टप्प्यात!

    भाजपाचे मताधिक्य ८ टक्क्यांनी वाढणार असल्याचं बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : सहा-सात जागांवर पेच असून, त्यावर लवकर निर्णय होईल महायुतीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात असून, येत्या दोन तीन दिवसात चित्र स्पष्ट होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते कोराडी (नागपूर) येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.Mahayuti has not decided on seven seats but the discussion is in the final stage


    महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांवर निवडणूक, 5 जागांवर महायुतीचा विजय सहज शक्य


    बावनकुळे म्हणाले, रामेटक गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आहे, सध्या रामटेक शिवसेनकडेच आहे. त्यावर लवकरच निर्णय होईल. तर अमरावतीची जागा भाजपाकडे असून १०० टक्के भाजपाच्या चिन्हावर लढू. देशात मोदी प्रधानमंत्री व्हावे यासाठी सर्व प्रयत्न करतील. संभाजीनगर जागेबाबत कोणताही तिढा नाही तर मुंबईच्या जागांबाबत शिंदे निर्णय घेतील. मनसे किंवा इतरांमुळे उमेदवार जाहीर करण्यास वेळ होत नाही.

    याशिवाय महायुतीमधील भाजपासह सर्व १३ घटक पक्ष एकत्र निवडणूक लढविणार आहेत. प्रत्येक बुथवर आम्ही लक्ष केंद्रित केले. मोदी सरकारच्या काळात ५० वर्षांत जे मिळाले नाही ते १० वर्षांत मिळाले. या निवडणुकीत मागील भाजपाला सात ते आठ टक्के जादा मते मिळतील. ५१ टक्के मतदान घेऊन महाराष्ट्रात ४५ प्लस जागा महायुतीला मिळतील. पंतप्रधान कोण व्हावे हे जनतेला चांगले कळते, असेही ते म्हणाले

    Mahayuti has not decided on seven seats but the discussion is in the final stage

    महत्वाच्या बातम्या

     

     

     

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा