विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे चपट्या पायाचे सरकार आहे. हे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वषार्पासून राज्याला पनवती लागली आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केली आहे. सरकारला दोन वर्ष होऊन गेली. मात्र या सरकारने फक्त लोकांना फसवण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला.Mahavikas Aghadi flat-footed government, Nitesh Rane’s criticism
राणे म्हणाले, राज्यात घरात पाणी आले नाही की हे केंद्राकडे बोट दाखवतात. सगळे सांगत होते केंद्रामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. संसदेमध्ये एक कायदा पारित केला गेला. त्यात आरक्षण कुठल्या समाजाला किती, कसे द्यायचे, याचे सगळे अधिकार राज्य सरकारचे असल्याचे या कायद्यात नमूद करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयातही या सगळयाची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे. या अगोदर राणे समिती स्थापन झाली आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले गेले. राज्य सरकारला अधिकार दिले.
राज्य सरकार आपल्या अधिकार चौकटीत आरक्षण देऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एवढी ताकद दिली होती की, त्यांना केंद्राकडे हात पसरण्याची गरज नाही. एवढी ताकद त्या घटनेत आहे.सरकारने आता आरक्षण प्रश्नी भोसले समितीची स्थापना केली आहे. या भोसले समितीने काय दिवे लावले? याचे उत्तर सरकारने आम्हाला द्यावे, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
Mahavikas Aghadi flat-footed government, Nitesh Rane’s criticism
महत्त्वाच्या बातम्या
- रामजन्मभूमी खटल्याचा निकाल धर्माच्या नव्हे तर कायदे आणि संविधानाच्या आधारावर, रंजन गोगोई यांनी केले स्पष्ट
- जमीनीवरील राजकारणी, वेदना सहन करत महिला खासदार सायकलवर जाऊन प्रसुतीसाठी झाल्या दाखल
- नव्या वर्षात १२ सुट्या वाया! शनिवार-रविवारी आल्याने होणार कर्मचाऱ्यांचे नुकसान
- सायरस पूनावाला सोडून जगातील सगळ्या धनाड्यांना ओमिक्रॉन कोरोना व्हायरस झटका, अब्जावधी रुपयांचे नुकसान