• Download App
    महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर जगात सर्वाधिक, शाळा-महाविद्यालयांवर बंदीची कुऱ्हाड चालविणाऱ्या सरकारला उपचाराच्या सुविधा देणे जमेना|Maharashtra's corona mortality rate is highest in the world.

    महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर जगात सर्वाधिक, शाळा-महाविद्यालयांवर बंदीची कुऱ्हाड चालविणाऱ्या सरकारला उपचाराच्या सुविधा देणे जमेना

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शाळा, महाविद्यालयांपासून ते सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदीची कुऱ्हाड चालविणाऱ्या महाविकास आघाडी सरकारला रुग्णालयांत पुरेशा सुविधा देणे मात्र शक्य झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राचा मृत्यूदर जगात सर्वाधिक आहे.Maharashtra’s corona mortality rate is highest in the world.

    राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालातून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. राज्यात कोरोनामुळे होणारा मृत्यूदर हा जास्त आहे. राज्यातील दैनंदिन रुग्णवाढीचा दर हा 31 मे, 2021 रोजी 0.37 होता जो 27 सप्टेंबर, 2021 ला 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे.



    याचा अर्थ रुग्णवाढ लक्षणीयरित्या कमी झाली आहे. रुग्ण बरं होण्याचं प्रमाणही 97.26 टक्क्यांवर पोहोचले आहे. पण त्याचवेळी मृत्यूदर मात्र वाढला आहे. 31 मे रोजी 1.66 टक्क्यांवर असलेला मृत्यू 31 आॅगस्टला 2.12 वर पोहोचला. जो 27 सप्टेंबरला वाढला नाही. पण कमीही झालेला नाही. जैसे थेच राहिला आहे.

    महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर हा जगातील कोरोना मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. जगातील कोरोना मृत्यूदर हा 2.05 टक्के आहे पण महाराष्ट्रात हा 2.12 आहे. महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील कोरोनाचा मृत्यूदर हा जगातील कोरोना मृत्यूदरापेक्षाही जास्त आहे. जगातील कोरोना मृत्यूदर हा 2.05 टक्के आहे पण महाराष्ट्रात हा 2.12 आहे.

    Maharashtra’s corona mortality rate is highest in the world.

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Piyush Goyal : भारताची टॉफी निर्यात 12 वर्षांत 166% वाढली; आर्थिक वर्ष 2026 मध्ये ₹132 कोटींवर, मंत्री पीयूष गोयल यांनी डेटा जारी केला

    भारत – सायप्रस यांच्यात संरक्षण, गुंतवणूक, सायबर सुरक्षा आणि व्यापार विकास करार; राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या!!

    Manoj Jarange : समाजाशी दगाफटका करू नका, 23 मेपूर्वी चर्चेला या; प्रसाद लाडांच्या शब्दावर विश्वास ठेवून गावागावातील बैठका थांबवल्या- मनोज जरांगे