• Download App
    Maharashtra Political Crisis : ‘’आता आम्हीच सर्वात मजबूत विरोधी पक्ष’’ म्हणत, काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर ठोकाला दावा! Maharashtra Political Crisis Now we are the strongest opposition party Congress claimed the post of leader of the opposition

    Maharashtra Political Crisis : ‘’आता आम्हीच सर्वात मजबूत विरोधी पक्ष’’ म्हणत, काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर ठोकाला दावा!

    शरद पवारांनी कालच जितेंद्र आव्हाडांना विरोधी पक्षनेते  पदाची दिली होती जबाबदारी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात नाट्यमय राजकीय घडामोडी सुरू आहेत. एकीकडे राष्ट्रवादीत महाबंडखोरी झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटक पक्षात विरोधी  पक्षनेते पदासाठी चढाओढ सुरू झाल्याचे दिसत आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवारांनी काल जितेंद्र आव्हाडांना विरोधी पक्षनेते  पदाची जबाबदारी दिल्यानंतर, आज काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला आहे. Maharashtra Political Crisis Now we are the strongest opposition party Congress claimed the post of leader of the opposition

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत की, विरोधी पक्षनेता हा काँग्रेसचाच असावा. या मुद्द्यावर काँग्रेसची बैठकही होणार आहे. तसेच, ज्याच्याकडे जास्त संख्याबळ असेल त्याच पक्षाचा विरोधी पक्षनेते केला जाईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.

    ‘’आता काँग्रेस हा विरोधी पक्षातील सर्वात मजबूत पक्ष आहे. आमचे आमदार पक्षात अबाधित आहेत. 2019 मध्ये आमचे 44 आमदार होते, आता आमचे 45 आहेत. काँग्रेस महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करणार आहे. उद्याही या विषयावर बैठक होणार आहे.’’ असं थोरात म्हणाले आहेत.

    याशिवाय, महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा असल्याने महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल, आम्ही पुढील धोरणावर चर्चा करू. महाविकास आघाडीची बैठकही लवकरच होणार आहे. असेही यावेळी थोरात यांनी सांगितले.

    Maharashtra Political Crisis Now we are the strongest opposition party Congress claimed the post of leader of the opposition

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!